Home मराठवाडा पांढर्‍या सोन्याला तेजी येणार परंतु अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त. —————————————-...

पांढर्‍या सोन्याला तेजी येणार परंतु अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त. —————————————- शेतकऱ्यांसमोर मोठे संकट, झालेला खर्च निघणे मुश्किल.

280
0

राजेंद्र पाटील राऊत

पांढर्‍या सोन्याला तेजी येणार परंतु अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त.

—————————————-

शेतकऱ्यांसमोर मोठे संकट, झालेला खर्च निघणे मुश्किल.
—————————————-
ब्युरो चीफ बबन निकम औरंगाबाद

यंदा पांढरे सोने (कापूस) बाजारात तेजीत विकत असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून अधिकचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांना कापूस देण्याकडे कल वाढतअसल्याचे चित्र दिसत आहे.शासनाच्या वतीने कापूस खरेदी केंद्र अद्यापही सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना आपल्या कापसाला योग्य भाव मिळेलच याची शाश्वती नसल्याने पहिल्या वेचणीतच कापूस उत्पादक शेतक-यांनी कापूस विक्रीसाठी बाजारात गर्दी केली आहे.कारण खरेदी केंद्र सुरू होण्यास वेळ असल्याने कपाशीची पहिली वेचणी आटोपल्यानंतर जिल्ह्यात दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. चिकटगाव येथील आदेश कृषी सेवा केंद्र येथे नवीन कापूस खरेदी सुरू करण्यात आली .
यावेळी शेतकऱ्यांना 7500/- रुपये प्रति क्विंटलचा भाव देण्यात आला. जिल्ह्यात ओला दुष्काळ असल्यामुळे विविध नैसर्गिक संकटाचा फटका कपाशीला बसला असून बहुतांश शेतकऱ्यांना या पिकावर केलेला खर्च वसूल होणे कठीण असल्याचे दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Previous articleकांद्याचे दर कोसळले ;शेतकरी वर्ग हवालदिल
Next articleखेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना मिळते आंतरराष्ट्रीय कीर्ती                                     
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here