राजेंद्र पाटील राऊत
पांढर्या सोन्याला तेजी येणार परंतु अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त.
—————————————-
शेतकऱ्यांसमोर मोठे संकट, झालेला खर्च निघणे मुश्किल.
—————————————-
ब्युरो चीफ बबन निकम औरंगाबाद
यंदा पांढरे सोने (कापूस) बाजारात तेजीत विकत असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून अधिकचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांना कापूस देण्याकडे कल वाढतअसल्याचे चित्र दिसत आहे.शासनाच्या वतीने कापूस खरेदी केंद्र अद्यापही सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना आपल्या कापसाला योग्य भाव मिळेलच याची शाश्वती नसल्याने पहिल्या वेचणीतच कापूस उत्पादक शेतक-यांनी कापूस विक्रीसाठी बाजारात गर्दी केली आहे.कारण खरेदी केंद्र सुरू होण्यास वेळ असल्याने कपाशीची पहिली वेचणी आटोपल्यानंतर जिल्ह्यात दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. चिकटगाव येथील आदेश कृषी सेवा केंद्र येथे नवीन कापूस खरेदी सुरू करण्यात आली .
यावेळी शेतकऱ्यांना 7500/- रुपये प्रति क्विंटलचा भाव देण्यात आला. जिल्ह्यात ओला दुष्काळ असल्यामुळे विविध नैसर्गिक संकटाचा फटका कपाशीला बसला असून बहुतांश शेतकऱ्यांना या पिकावर केलेला खर्च वसूल होणे कठीण असल्याचे दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.