Home नांदेड पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तात्काळ ठोस निर्णय घ्या-शिवशंकर पाटील कलंबरकर

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तात्काळ ठोस निर्णय घ्या-शिवशंकर पाटील कलंबरकर

145
0

राजेंद्र पाटील राऊत

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तात्काळ ठोस निर्णय घ्या-शिवशंकर पाटील कलंबरकर
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
दिनांक 6 सप्टेंबर रोजीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस 7 सप्टेंबर सायंकाळी 5 प्रयत्न सारखा चालू असल्यामुळे,मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद,बाऱ्हाळी,एकलारा,जांब,सावरगाव,येवती,चांडोळा मंडळामध्ये प्रलयकारी महाभयंकर महापूर आला होता.महापुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता.पुरात माणसे वाहून गेली होती.मा.जिल्हाधिकारी,तहसीलदार साहेबांनी प्रशासनाच्या मदतीने जनतेला पुरात मदत केली.
पण,प्रलयकारी महापुराने होत्याचे नव्हते करून टाकले.नदी, नाल्यालगतच्या शेतातली पिके वाहून गेली,तालुक्यातील संपूर्ण शेती पिकांसह पाण्यात उभी आहे.तालुक्यातील अनेक ठिकांची पुलं,रस्ते वाहून गेली आहेत.महापुरात प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.सामान्य माणूस पूर्णतः कोलमंडून गेला आहे.या परिस्थितीमध्ये जनतेला आपल्याकडून,१)विमा कंपनीला महसूल,कृषी पंचनाम्याच्या आधारे सरसकट 100% विमा मंजूर करण्याचे आदेश द्या.२)शेतकऱ्यांना 2019 प्रमाणे नुकसानभरपाई देण्याचे आदेश काढा.३)पूरग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा.४)महापुरात वाहून गेलेल्या पुलांची व रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश द्या.५)चालू कर्जदार शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर 50 हजार रुपय माफ करा.या ठोस निर्णयाची तात्काळ गरज आहे.मा.मुख्यमंत्री महोदयांनी यावर तात्काळ निर्णय घेऊन कोलमंडून गेलेल्या जनतेला आधार द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्या मार्फत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवाजिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी निवेदनातून केली आहे.

Previous articleनवे पारगाव येथे यशवंत सेनेच्या आधारकार्ड मोबाईल लिंकिंग कॅम्प मध्ये 335 नागरिकांनी घेतला लाभ           
Next articleवीज वितरण कंपनीचे शहरात असलेले खांब डीपी यांना फाळा आकारणी यावी. = उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here