राजेंद्र पाटील राऊत
आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रम शाळेतील व वस्तीगृहातील रोजंदारी कर्मचाऱ्यांची येत्या २८ जून पासून पदयात्रा निघून आत्मदहन इशारा कळवण,(नारायण भोये विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)
शासकीय आश्रम शाळा व वस्तीगृहात रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांना शासनाने कायमस्वरूपी सेवेत सामावून द्यावे त्यासाठी येत्या सोमवारी दिनांक २८पासून राज्यव्यापी पदयात्रा करून आत्मदहन करण्याचा इशारा रोजंदारी संघटना कृती समिती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे डिसेंबर २०२० मध्ये आदिवासी विकास विभाग वर्ग-३ व वर्ग-४ रोजंदारी कर्मचारी यांनी नासिक ते मुंबई मंत्रालय अशी पदयात्रा काढलेली होती परंतु त्यात आमदार हिरामण खोतकर यांनी आंदोलकांना गुंडेगाव तालुका इगतपुरी थांबून शासन व आंदोलक यांच्यात मध्यस्थी केल्यानंतर आंदोलकांनी पदयात्रा केली होती मात्र या घटनेला सहा महिने उलटून गेले असल्यावर सुद्धा शासनाने याबाबत दखल घेतलेली नाही त्यामुळे रोजंदारी कर्मचारी यांच्यामध्ये नाराजी होतांना दिसून येत आहे विशेष म्हणजे कोरणा सारख्या महामारी मध्ये शासनाकडून या कर्मचाऱ्यांना विना पगार अने घरी थांबावे लागले त्यामुळे रोजंदारी वर्ग-३ व वर्ग ४ कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली तसे पाहिले तर माननीय मुख्यमंत्री साहेब व पंतप्रधान साहेब यांच्याकडून सूचना काढण्यात आलेल्या होता की कोरोना कालखंडामध्ये कुणाचाही पगार कमी करू नये किंवा कोणत्याही कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही याबाबत दखल घ्यावी असे निर्देश देण्यात आले होते पण मात्र मुख्यमंत्री साहेब व माननीय पंतप्रधान साहेब यांच्या शब्दाला आदिवासी विकास विभाग यांनी मानस दिला नाही की काय असे संचय कर्मचाऱ्यांमध्ये होताना दिसून येत आहे