राजेंद्र पाटील राऊत
छ.शिवाजी महाराजांच्या कृषी धोरणाचा आदर्श राज्यकर्त्यांनी घ्यावा, प्रा.डॅा.माने
पेठ वडगाव: छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील रयतेच्या कल्याणासाठी आदर्श प्रशासन व्यवस्था निर्माण केली. त्यांनी कृषी, व्यापार व लोककल्याणासाठी वापरलेल्या धोरणांची उपयुक्तता आजच्या काळातही दिसून येते. तेंव्हा महाराजांचा आदर्श समोर ठेऊन राज्यकर्त्यांनी आपली धोरणे ठरवावीत असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. संभाजीराव माने यांनी केले. ते श्री विजयसिंह यादव महाविद्यालयातील एन. सी. सी. विभागामार्फत शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. सचिन पवार होते.
डॉ. माने पुढे म्हणाले कि शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया हा जनकल्याण व भेदभाव विरहित समाज या मूल्यावर घातला. महाराज हे निडर योद्धा व कुशल प्रशासक होते. तरुणांनी त्यांचा आदर्श समोर ठेवून जीवनध्येय प्राप्त करावे.
राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अधिकराव निकम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे शोर्य, नाविन्यता, रयतेविषयीचा जिव्हाळा, धर्मनिरपेक्षता , लोकसंग्रह इ. गुणांची माहिती देवून महाराज हे जाणता राजा केसे होते हे सदोहरण सांगितले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. सचिन पवार यांनी छ. शिवाजी महाराजांची व्यवस्थापन कौशल्य जगाने स्वीकारली असल्याचे सांगून आजच्या तरुण पिढीने जगाच्या स्पर्धेत सक्षमपणे यशस्वी होण्यासाठी प्रेरणा स्त्रोत म्हणून छ. शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. सी. सी. विभाग प्रमुख डॉ. प्रशांत यादव यांनी केले तर आभार प्रा. अतिष खांडेकर यांनी मानले. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्राचार्य डॉ. विजया चव्हाण यांचे मार्गदर्शन तर डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. अमर पोवार, श्रीनिवास रोंगटे, अमर होगाडे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास एन. सी. सी. विभागातील छात्र उपस्थित होते.
श्री. विजयसिंह यादव महाविद्यालयातील एन. सी. सी. विभागामार्फत शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. संभाजीराव माने सोबत डॉ. सचिन पवार, डॉ. बाळासाहेब जाधव, प्रा. अधिकराव निकम, डॉ. प्रशांत यादव व प्रा. अतिष खांडेकर इत्यादी उपस्थित होते.