राजेंद्र पाटील राऊत
उत्तराखंडमधील दुर्दैवी घटणेत १५० जण बेपत्ता त्यापैकी १० मृतदेह सापडली
उत्तराखंड मधील जोशीमठ तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना आज सकाळी घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला मोठा महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जोशीमठ तालुक्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळी १०.५५ वाजता ही दुर्घटना घडली. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हिमकडा कोसळला. त्यामुळे या धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यातच या धरणाचा कडाही तुटल्याने या ठिकाणी पाणीच पाणी झाले असून अनेक घरे व १५० माणसे वाहून गेलेली आहेत त्यापैकी १० मृतदेह सापडले आहेत निसर्गाच्या या प्रकोपामुळे उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार माजला असून या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .