राजेंद्र पाटील राऊत
ग्रामपंचायत निवडणुकीची मोठी बातमी सरपंचाची सोडत निवडणुकीनंतर आधीची सोडत रद्द..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुंबई राज्यातल्या 14000 ग्रामपंचायतीचे सरपंचाची आरक्षण सोडत जानेवारीत काढणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. सरपंच निवडणुकीच्या निमित्ताने होणारा घोडेबाजार तसेच खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे सरपंच पद मिळवण्याचे प्रकार रोखण्यासाठी राज्यात प्रथमच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. यावेळी आठ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी त्या जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत काढली आहे मात्र आधीच आरक्षण सोडत काढल्याने सरपंच होण्यासाठी किंवा त्या पदावर आपल्या मर्जीतील व्यक्तीची वर्णी लावण्यासाठी मोठ्याप्रमाणात घोडेबाजार होतो तसेच बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवून सरपंच होणाऱ्यांची संख्या वाढत आहे या प्रकाराला लगाम घालण्यासाठी आरक्षण सोडत पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदाची सोडत निवडणूक झाल्यानंतर काढण्यात येईल . अशी माहितीही हसन मुश्रीफ यांनी दिली आहे