Home नांदेड अखेर कुंटुर पोलिसांनी केले शासनाच्या अपहार प्रकरणातील फरार आरोपी निलंबित ग्रामसेकास जेरबंद

अखेर कुंटुर पोलिसांनी केले शासनाच्या अपहार प्रकरणातील फरार आरोपी निलंबित ग्रामसेकास जेरबंद

111
0

राजेंद्र पाटील राऊत

अखेर कुंटुर पोलिसांनी केले शासनाच्या अपहार प्रकरणातील फरार आरोपी निलंबित ग्रामसेकास जेरबंद

नांदेड, दि.६ – राजेश एन भांगे

दुगाव ग्रामपंचायत कार्यालयातील निलंबित ग्रामसेवक शेषेराव विक्रम कौशल्ले वय ४२ वर्ष रा. उमरा ता. लोहा याच्यावर शासनाच्या अपहार प्रकरणी मागील दीड वर्ष पासून कूंटूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर ४४/२०२० कलम ४२०,४०९ भां द वी. व ९०/२०२० कलम ४२०,४०९ भा द वी. व तसेच कुंडलवाडी पोलीस स्टेशन व नायगांव येथील पोलिस स्टेशन मधील गुन्ह्यात सुद्धा शासनाच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल असून सदर आरोपी हा मागील दिड वर्षा पासून शासनाचा अपहार करून ( शासनाला चुना लाऊन ) पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून फरार होता.
परंतु कळ दिनांक ०५-१२-२०२० रोजी पोलिस स्टेशन कुंटुर ठाण्याचे प्रभारी अधिकारी करीम खान पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक, व दिनेश शिवाजीराव येवले पोलीस उपनिरीक्षक यांना गुप्त खबऱ्या कडून माहिती मिळाली असता सादर आरोपी त्याच्या गावाकडे उमर ता. लोहा येथे येणार असल्याची खात्री लायक माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक करिमखान पठाण सोबतच पो.उ.नी. दिनेश येवले, बिट जमादार पो.ना./शेख अब्दुल बारी,पो. ना. उद्धव कदम,पो. कौ./१८७१ विवेक इश्र्वरे, पो.को. /२३७८ शंकर बुधेवड,चालक पो. हे. को.सदाशिव पाटी यांनी मोजे उमरा येथे तत्काळ दाखल होऊन सापळा रचला व सादर आरोपीस अटक केली आहे.
व तसेच पुढील तपास कुंटूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक करीम खान पठाण हे करीत आहेत.

Previous articleएप्रिल २०२३ पर्यंत इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेबांचे स्मारकाचे काम पूर्ण करू – धनंजय मुंडे*
Next articleमहामानवाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे दीक्षाभूमीवर अभिवादन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here