राजेंद्र पाटील राऊत
पुणे ५ डिसेबंर ⭕(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी पुणे)⭕
पुणे_आळदी देवाची येथे उद्या पासून संचार बंदी लागू
आषाढी कार्तिकी वारी नंतर आता तीर्थक्षेत्र आळंदी येथे दरवर्षी होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यावर कोरोनाच सावट निर्माण झाले आहे.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर आळंदीत उद्यापासून ६ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
पिंपरी चे पोलीस उपायुक्त मंच्चाक इप्पर यांनी ही माहिती दिली आहे.
आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रा येत्या दिनांक 8 डिसेंबर ते दिनांक 14 डिसेंबर होणार आहे. मात्र यंदा कोरोनाच संकट निर्माण झालं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आळंदी शहरासह आजूबाजूंच्या गावांमध्ये पोलीस प्रशासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
उद्यापासून आळंदीत कलम 141 लागू करण्यात येणार आहे.
त्यामुळे बाहेरून आलेल्या कोणत्याही व्यक्तीला आळंदी शहरात प्रवेश करता येणार नाही.
यापार्श्वभूमीवर यंदाचा संजीवन समाधी सोहळा कसा पार पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आळंदी शहरात सर्व रस्ते वाहतूक बंद करण्यात येणार आहे व मोठा पोलीस बंदोबस्त तनात करण्यात येणार आहे.