Home Breaking News *नांदेडच्या जिल्हाधिका-यांना शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या वतीने निवेदन सादर*..

*नांदेडच्या जिल्हाधिका-यांना शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या वतीने निवेदन सादर*..

120
0

*नांदेडच्या जिल्हाधिका-यांना शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या वतीने निवेदन सादर*.. जाहूर (मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) अतिवृष्टी व ढग फुटी भागातील शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मंजूर करण्यात यावा. अन्यथा शेतकरी बचाव संघर्ष समिती नांदेड च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा. कृषी राज्यमंत्री माननीय विश्वजीत कदम यांना दिले संघर्ष समितीच्या वतीने निवेदन. जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले पण ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकावर विमा मिळावा म्हणून iffco-tokio या कंपनीकडे आपला पिक विमा भरला अशा शेतकऱ्यांना तात्काळ शासन निर्णयानुसार अतिवृष्टी व ढगफुटी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पीक विम्याची रक्कम जमा करण्यात यावी अशी मागणी विचार शिवछत्रपतींचा सन्मान बळी राजांचा हे घोषवाक्य घेऊन मैदानात उतरलेल्या शेतकरी बचाव संघर्ष समितीचे धनंजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली बालाजी पाटील सांगवीकर बालाजी पाटील ढोसणे यांनी नांदेड येथे राज्याचे कृषी राज्यमंत्री माननीय विश्वजीत कदम सर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यामध्ये संघर्ष समितीच्या वतीने जाचक अटी रद्द करून शेतकरी कंगाल पिक विमा कंपनी मालामाल हे धोरण तात्काळ बदलून शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पीक विम्याची रक्कम जमा करण्यात यावी व ज्या वर्षी ओला व कोरडा दुष्काळ जाहीर झालेल्या 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी कमी आलेल्या सर्व महसूल मंडळात पीक कापणी प्रयोग न करता सरसकट पीक विमा मंजूर करण्यात यावा उंबरठा उत्पन्न 70 टक्के ऐवजी 90 टक्के करण्यात यावे यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल पिक विमा मंजुरीबाबत सुरू असलेले पीक कापणी प्रयोग मंडल स्तरावरून गावस्तरावर घेतले जावेत पाऊस प्रजन्यमान केंद्राची संख्या वाढविण्यात यावी सरासरी पाच वर्षाची अट रद्द करून ज्या वर्षी ज्या पिकावर विमा भरला त्याचा पिकाच्या परिस्थितीवर शेतकऱ्यांना विमा कवच देण्यात यावे अशी मागणी शेतकरी बचाव संघर्ष समितीचे धनंजय सूर्यवंशी बालाजी पाटील सांगवीकर बालाजी पाटील ढोसणे यांच्यावतीने करण्यात आली नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पाऊस व अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन वरील मागण्या तात्काळ मान्य कराव्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही शेवटी निवेदनात देण्यात आला निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांना देण्यात आल्या.

Previous article*देवळ्यात कांदा चोरीचे सत्र सुरूच ; वाखारवाडीत कांदा चाळीचे तोडले कुलूप ; अज्ञात चोरट्यानी कांद्यावर मारला डल्ला*
Next article🛑 शिवसेनेचा भगवा फडकवा….! हे ३० वर्षापासून ऐकतोय :- शरद पवार 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here