Home Breaking News *गरबड गावात जागतिक आदिवासी दिन साजरा*

*गरबड गावात जागतिक आदिवासी दिन साजरा*

97
0

*गरबड गावात जागतिक आदिवासी दिन साजरा* मालेगांव,( श्रीमती आशा बच्छाव व्यवस्थापकीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)- मालेगाव तालुक्यातील गरबड गावात आदिवासी विचार मंच व एकलव्य संघटना गरबड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.मा. सरपंच चिंतामण भांगरे अध्यक्षस्थानी होते.धरती आबा बिरसा मुंडा,आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे, भगवान वीर एकलव्य,राणी दुर्गावती,खाजा नाईक यांच्या प्रतिमांचे पुजन केले.विष्णू भांगरे,भीमराव भांगरे,झेलाबाई सोनवणे, नाना रगतवाण, संजय भांगरे विचारपीठावर उपस्थित होते.गोरख नाडेकर यांनी प्रास्ताविक केले. आनंदा माळी यांनी वीर एकलव्य चरित्र वर्णन केले. समाधान गुमाडे यांनी आदिवासी दिनाचे महत्व सांगितले. गोरख भांगरे यांनी राघोजी भांगरेची शौर्यगाथा सांगितली.पांडुरंग गुमाडे यांनी धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित प्रसंग सांगितले.नितीन गुमाडे यांनी क्रांतीकारकांचे पोवाडे सादर केले.शासकीय आश्रम शाळेतही कार्यक्रम संपन्न झाला.त्यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. वृक्षारोपण करण्यात आले. सुभाष गुमाडे,बापू वेडेकर, विष्णू गुमाडे, पोपट भांगरे,वसंत भांगरे, धाकु नाडेकर, प्रहलाद पेढेकर, प्रसाद गुमाडे, लक्ष्मण पेढेकर, भीमा माळी, सुरेश गुमाडे, दगा सोनवणे ,चुणीलाल भांगरे, नितीन गायकवाड, गुलाब भांगरे, रंगनाथ भोईर,भावडू गुमाडे, समाधान बगाड,देविदास कावळे,शरद गुमाडे,बाबाजी माळी, भीमा माळी, गोविंदा गुमाडे, अमोल सोनवणे, रामदास घोडे,रोहित सारुकते,निवृत्ती घोडे, काकाजी भांगरे,जितेंद्र रगतवाण, काशिनाथ गुमाडे,संजय सोनवणे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. बजरंग गुमाडे यांनी सूत्रसंचालन केले तर नागेश गुमाडे यांनी आभार मानले.

Previous articleशिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’
Next article*एसटीला राज्य शासनाचा दर्जा मिळावा*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here