Home Breaking News राज्या कर्मचार्‍यांचे निवृत्ती वय ५८ वरुन ६० होण्याची शक्यता! (...

राज्या कर्मचार्‍यांचे निवृत्ती वय ५८ वरुन ६० होण्याची शक्यता! ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

84
0

🛑 राज्या कर्मचार्‍यांचे निवृत्ती वय ५८ वरुन ६० होण्याची शक्यता! 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕राज्य सेवेतील कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याचा राज्य सरकार विचार करत असून याबाबत महिनाअखेरीस निर्णय होेण्याची शक्यता आहे.राज्यात सध्या 16 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी कार्यरत आहेत. यामधील सनदी अधिकारी आणि सफाई कर्मचारी वगळता राज्य कर्मचार्‍यांच्या निवृत्तीचे वय 58 आहे. ते 60 करावे अशी, मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने अनेकदा केली आहे. या मागणीवर आपण सकारात्मक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच सांगितले होते.

लॉक डाऊनामुळे राज्याच्या तिजोरीत खणखणाट आहे. कर्मचार्‍यांचे पगार देणेही सरकारला अवघड झाले आहे.
अशा परिस्थितीत सुमारे 3 टक्के कर्मचारी निवृत्त झाल्यास त्यांना भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी, गटविमा तसेच इतर देणीपोटी सरकारला लाखो रुपये मोजावे लागतील आणि तिजोरीवर आणखी ताण पडेल. यामुळेच निवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याचा विचार सुरू झाल्याचे समजते.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे म्हणाले, यासंदर्भात आम्हाला काही कळवलेले नाही. मात्र सरकारने हा निर्णय घेतल्यास सरकारचे आम्ही स्वागतच करू….⭕

Previous articleपुण्यातील या भागात २९ तारखेला जनता कर्फ्यू ! ⭕ ✍️ वारजे माळवाडी ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ) वारजे माळवाडी (पुणे):
Next articleआ. भास्करराव जाधव यांच्याकडून**चिपळूण मतदारसंघातील जनतेसाठी* *आर्सेनिक अल्बम-३० गोळया सुपूर्द* ✍️ चिपळूण ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here