Home Breaking News डोंबिवलीकरांना कामावर जाण्यासाठी लावाव्या लागल्या भल्या मोठ्या रांगा !

डोंबिवलीकरांना कामावर जाण्यासाठी लावाव्या लागल्या भल्या मोठ्या रांगा !

183

🛑 डोंबिवलीकरांना कामावर जाण्यासाठी लावाव्या लागल्या भल्या मोठ्या रांगा ! 🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

डोंबिवली :⭕ कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आजपासून कार्यालये, मंदिरांसह अन्य व्यवसाय सुरु करण्याची मुभा दिली आहे. यामुळे जीव धोक्यात घालून डोंबिवलीतील नोकरदार वर्ग कार्यालयात जाण्यासाठी तयार झाला आहे. मात्र, पहिल्याच दिवशी नियोजनाचा फज्जा उडालेला दिसून आला.
डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यामुळे जवळपास दोन किमी पर्यंत रांग लागल्याचे दिसून आले. सोमवारपासून मुंबई हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.
मात्र, बसचे नियोजन नसल्याने या नोकरदारांच्या त्रासात भर पडली आहे.
राज्य शासनाच्या नियोजनाचा फज्जा उडाला असून बस येणार असे सांगूनही आलेल्या नाहीत, नागरिक त्रस्त झाले असून कामावर जायचे तरी कसे? आणि पुन्हा यायचे कसे? असा सवाल महिलांनी केला असून दिवस कसे काढायचे, सोशल डिस्टन्सच्या नियमांचे काय होणार असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
डोंबिवली येथून सायन, मुंबई, अंधेरी, दादर, घाटकोपर, तसेच मानखुर्द, मंत्रालय आदी भागात जाण्यासाठी सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांनीही गर्दी केली होती.⭕

Previous articleवाशिम जिल्ह्यात परतणार्‍यानी वाढविली चिंता !
Next articleअजितदादांचे पहाटे साडेपाचला काम सुरू होते तेव्हा!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.