Home कोरोना ब्रेकिंग जिल्हासाठी दिलासादायक बातमी १६५२ पैकी १०४९ रुग्ण करोनामुक्त !

जिल्हासाठी दिलासादायक बातमी १६५२ पैकी १०४९ रुग्ण करोनामुक्त !

102
0

🛑 जिल्हासाठी दिलासादायक बातमी १६५२ पैकी १०४९ रुग्ण करोनामुक्त ! 🛑
औरंगाबाद:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

औरंगाबाद :⭕ जिल्ह्यात पुन्हा ५५ कोरोना बाधितांची वाढ झाल्याने एकूण कोरोना बाधितांची संख्या १६४२ झाली आहे. तसेच आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान सोमवारी रात्री साडेअकरा वाजता खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ७९ झाली आहे. एकूण बाधितांपैकी १०४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आता ५१४ बाधितांवर उपचार सुरू आहे.

नव्याने आढळलेल्या रुग्णांचा तपशील
शहा बाजार येथील १, किराडपुरा २, चंपा चौक १, कटकट गेट १, नारळीबाग १, गणेश कॉलनी १, जवाहर नगर ३, भीम नगर २, हमालवाडी १, शिवशंकर कॉलनी २, नाथ नगर २, ज्योती नगर १, फजलपुरा परिसर १, मिल कॉर्नर १, एन-तीन सिडको १, एमजीएम परिसर १, रोशन गेट १, विशाल नगर, गारखेडा परिसर १, एन-सहा संभाजी कॉलनी ७, समता नगर ५, अंहिसा नगर १, मुकुंदवाडी १, विद्या निकेतन कॉलनी १, न्याय नगर १, बायजीपुरा २, संजय नगर, मुकुंदवाडी ४, विजय नगर २, यशवंत नगर, पैठण १, चंपा चौक, म्हाडा कॉलनी १, नेहरु नगर १,जुना मोंढा नाका परिसर १, अन्य भागातील ३ रहिवाशांचा समावेश आहे.
यामध्ये २४ महिला आणि ३१ पुरुष रुग्ण आहेत
औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी ४४ काेराेना रुग्ण वाढले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १५८७ झाली. दिवसभरात सहा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शहरातील पाच, तर जळगाव जिल्ह्यातील एका महिलेचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ७७ झाली अाहे. मृतांमध्ये बेगमपुरा येथील ६६ वर्षीय महिला, बारी कॉलनीतील ६३ वर्षीय पुरुष, बायजीपुरा येथील ६० वर्षीय पुरुष, भाग्यनगरातील ८० वर्षीय आणि समता नगरातील ७२ वर्षीय पुरुषाचा समावेश अाहे. जळगावच्या बडगुजर कॉलनी यावल येथील ६६ वर्षीय महिलेचाही घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. सहापैकी दाेघांचा घाटीत तर चाैघांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारी ३५ जणांना डिस्चार्ज मिळाला. आतापर्यंत एकूण १०६४ जण काेराेनामुक्त झाले असून आता फक्त ४६० काेराेनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत.⭕

Previous articleखासदार अमोल कोल्हे यांना गोळ्या घालण्याची भाषा! तिघांनवर गुन्हा दाखल
Next articleनिसर्ग’ चक्रिवादळ आज धडकणार; मुंबईपासून अवघ्या २०० कि.मी. अंतरावर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here