Home Breaking News पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा

243
0

🛑 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा 🛑
मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या दिशेने येत असलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पंतप्रधानांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा करून आढावा घेतला आणि केंद्र सरकारच्या वतीने आवश्यक असलेली सर्व मदत देण्याचं आश्वासनही दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि दमण दिव, दादरा आणि नगर हवेलीच्या प्रशासकांशीही चर्चा केली. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचा धोका असून बुधवारी ३ जून रोजी ते किनारपट्टीवर धडकणार आहे.

महाराष्ट्रात हरिहरेश्वरपासून ते दमणपर्यंत या वादळाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. तर नौदलही सज्ज आहे. मुंबई महापालिका आणि पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्हा प्रशासनही सज्ज आहे. याशिवाय अन्य महापालिका आणि प्रशासकीय यंत्रणाही या नैसर्गिक संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी रात्री ८ वाजता निसर्ग वादळाबाबत राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.⭕

Previous articleनांदेड येथे आज पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १५२ वर, तर दिवसभरात ३ रुग्णांची भर, तसेच दोन चिमुकल्यांचाही समावेश*
Next articleनिसर्ग’ चक्रीवादळ उद्या सकाळी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर धडकणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here