Home कोरोना ब्रेकिंग मुंबई पोलिसांना केलेल्या मदतीबद्दल ” सलमान ” तुझे आभार! उद्धव ठाकरे

मुंबई पोलिसांना केलेल्या मदतीबद्दल ” सलमान ” तुझे आभार! उद्धव ठाकरे

98
0

🛑 मुंबई पोलिसांना केलेल्या मदतीबद्दल ” सलमान ” तुझे आभार! उद्धव ठाकरे 🛑
मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेष म्हणजे हजारांपेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्याची काळजी म्हणून अभिनेता सलमान खानने एक लाख सॅनिटायझर बॉटलचा पुरवठा मुंबई पोलिसांना केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सलमानच्या या मदतीबद्दल ट्विटरवरून त्याचे आभार मानले आहेत. आपल्या मुंबई पोलिसांना केलेल्या मदतीबद्दल सलमान तुझे आभार ! असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

देशात लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे रोजगारही थांबला आहे. अशात अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सलमानने आपली जबाबदारी ओळखून यापूर्वी बॉलिवूड इंडस्ट्रीतील २५ हजार कामगारांना मदत केली होती. या कामगारांना काम नसतानाही वेतन देण्याचे काम सलमानने केले. त्यानंतर, मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी सलमान पुढे आला आहे.

आपल्या बिइंग ह्युमन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सलमानने एक लाख सॅनिटायझरच्या बाटल्स मुंबई पोलिसांनी दिल्या आहेत. दरम्यान गुरुवारी पहाटे ४ वाजेपर्यंतच्या राज्यातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत २२ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. यात मुंबईतील १३ पोलिसांचा समावेश आहे. २३६ अधिकारी, १,८५९ अंमलदार मिळून एकूण २,०९५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ८७९ उपचाराअंती बरे झाले आहेत. यात ७५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.⭕

Previous articleसॅनिटायझरच्या बॉक्समधून सुरू आहे या जीवघेण्या पदार्थाची तस्करी, मुंबईत रॅकेट उघड
Next articleनांदेडात मुंबईच्या एका रुग्णासह, दिवसभरात १६ जणांना सुट्टी, तर ३ रुग्णांची भर,२१ रुग्णांवर उपचार सुरू*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here