Home नाशिक कारचे पंक्चर काढत असताना भरधाव वाहनाची धडक; कोळगावच्या युवकासह दोघांचा मृत्यू

कारचे पंक्चर काढत असताना भरधाव वाहनाची धडक; कोळगावच्या युवकासह दोघांचा मृत्यू

187

आशाताई बच्छाव

1002034206.jpg

कारचे पंक्चर काढत असताना भरधाव वाहनाची धडक; कोळगावच्या युवकासह दोघांचा मृत्यू

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी

समृद्धी महामार्गावर जयपूर शिवारात कारचे पंक्चर काढत असताना भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत कोळगाव (ता.निफाड) येथील युवकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातात योगेश दत्तात्रय घोटेकर (३८, रा. कोळगाव, ता. निफाड) व देविदास नाना मते (६०, रा. जयपूर, ता. छत्रपती संभाजीनगर) यांचा मृत्यू झाला. तर बाळू विश्वनाथ घोटेकर (६०, रा. कोळगाव) गंभीर जखमी झाले आहेत.
घोटेकर हे रेशीम कोष विक्रीसाठी कारने जालन्याकडे जात होते. दरम्यान, मंगळवारी दहा वाजता कारचे पंक्चर झाल्याने ती महामार्गाच्या कडेला उभी करून दुरुस्ती सुरू होती. त्यावेळी शेतात काम करणारे देविदास मते मदतीसाठी आले. त्याचवेळी भरधाव वाहनाने तिघांना जोरदार धडक दिली. करमाड पोलिसांनी तातडीने जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी योगेश घोटेकर व देविदास मते यांना मृत घोषित केले. या अपघाताचा तपास पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, सुहास डबिर व विजयसिंग जारवाल करीत आहेत.

मदतीला धावलेल्याचाही बळी
देविदास मते हे अल्पभूधारक शेतकरी होते. शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. कार अडचणीत पाहून मदतीला धाव घेतली; पण भरधाव वाहनाच्या धडकेत त्यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित तीन मुली व मुलगा असा परिवार आहे.

Previous articleमुंबई ची अंजली अहिरे नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित
Next articleपूरग्रस्तांना मदतीचा हात – मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.