Home जालना जिवंत व्यक्तीला मृत दाखवून सहा लाख अठ्याहत्तर हजार लाटले!

जिवंत व्यक्तीला मृत दाखवून सहा लाख अठ्याहत्तर हजार लाटले!

43
0

आशाताई बच्छाव

1001680159.jpg

जिवंत व्यक्तीला मृत दाखवून सहा लाख अठ्याहत्तर हजार लाटले!
जालना जिल्ह्यातील मंठा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल

जाफ्राबाद जालना जिल्हा प्रतिनिधी-मुरलीधर डहाके

सविस्तर वृत्त असे की जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाच्या कामगार कल्याण योजनेतील 6 लाख 78 हजार रुपयांचे अनुदान लाटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बोगस कामगार प्रकरणी हा चौथा गुन्हा जालना जिल्ह्यात दाखल झाला आहे.यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी छत्रपती संभाजी नगर येथील सरकारी कामगार अधिकारी गोविंद गावंडे यांनी मंठा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे गावंडे यांच्यासह दक्षता पथकातील अधिकारी आकणी गावात भेट देऊन तीन व्यक्तींबाबत माहिती घेतली संबंधित स्वाती शिवाजी उबाळे,देवराव नारायण बदर व दुर्योधन रामभाऊ जाधव या तिघांचे कागदपत्र खोटे असल्याचे चौकशी स्पष्ट झाले आहे.
ग्रामसेवक खेडकर यांनी यासंदर्भात स्पष्टपणे सांगितले की वरील तीनही आखणी गावचे रहिवासी नाहीत तसेच ग्रामपंचायतीकडून कोणतेही मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यात आलेले नाही मात्र संबंधित नातेवाईक व दलालांनी बनावट मृत्यू प्रमाणपत्र ग्रामपंचायतचे सही व सिक्के वापरून शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात शिवाजी लक्ष्मण उबाळे, कमल देवराव बदर आणि तेजस दुर्योधन जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संतोष माळगे पुढील तपास करत आहे.

Previous articleआत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या दोन जनास चंदनझिरा पोलिसांनी केले अटक आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी
Next articleराज्यातील११ आदिवासी प्रकल्पांना स्वातंत्र्य प्रकल्प अधिकारी केव्हा?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here