Home गडचिरोली गोगाव येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी

गोगाव येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी

160

आशाताई बच्छाव

1001536772.jpg

गोगाव येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी                                                            गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

आज गोगाव येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली. शेतकरी आशिष रामचंद्र निजाम, जितेंद्र देवाजी चौधरी, आणि केवळराम हरी सालोरकर यांची भात पिके मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत.

या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करून नायब तहसीलदार यांच्यासोबत चर्चा केली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य मोबदला मिळावा यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत.

शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे आहोत!

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री प्रशांतजी वाघरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारतजी खटी, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे, श्री. विलासजी खेवले, गडचिरोली नायब तहसीलदार श्री. नंदुजी प्रधान, मंडळ अधिकारी गडचिरोली श्री. रुपेशजी गोरेवार, तलाठी श्री.उदयजी वायकुळे व सहकारी उपस्थित होते.

Previous articleगडचिरोलीत वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रणासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचं जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन
Next articleसन्मान द्या आणि सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.