आशाताई बच्छाव
आजचा शेतकरी कर्जबाजारी का झाला आहे ?
तालुका प्रतिनिधी जाफराबाद -मुरलीधर डहाके
दिनांक 25 /0 6/ 2024
सविस्तर वृत्त असे की, आजच्या युगातील शेतकरी कर्जबाजारी का झाला आहे ? याचं कारण गेल्या ४०/५० वर्षां अगोदर शेतकरी घरातील पारंपरिक बी बियाणे पेरणीसाठी वापरत होते. त्यामध्ये रासायनिक खताचा वापर नव्हता सेंद्रिय खत शेणखत याचा उपयोग जास्त प्रमाणात केला जात होता .आणि रासायनिक खते व संकरित बियाणे हे विकत घेण्याची गरज नव्हती . शेतातील तयार करण्यात आलेल्या पिकामधुनच चांगल्या प्रतीचे बियाणे पुढच्या वर्षीच्या पेरणीसाठी एकदम व्यवस्थितपणे ठेवत होते .त्यानंतर काही कालांतराने मोठमोठ्या कंपन्या मार्केटमध्ये आल्या आणि त्यांनी शेतकऱ्यांना हळूहळू संकरित बियाणे व रासायनिक खतांची सवय लावून दिली की, आमच्याकडून बी- बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके घ्या आणि या त्यांच्या षडयंत्राला शेतकरी राजा बळी पडला. त्यानंतर कंपनीने शेतकऱ्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. हायब्रीड बियाणे शेतकऱ्यांना कृषी सेवाच्या केंद्राच्या माध्यमातून घेण्यास भाग पाडले. रासायनिक औषधी रासायनिक खता -औषधाच्या चक्कर मध्ये शेतकरी हा पूर्णपणे कर्जबाजारी झाला आणि कर्जाच्या ओझाखाली दबला व कर्जात बुडाला.जेवढा माल झाला तेवढा बी, बियाणे, खते यामध्येच खर्च होऊन जातो खर्चाच्या प्रमाणात शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी राजा या कंपन्यांच्या कृषी सेवाच्या नादामध्ये कर्जबाजारी झाला.अनेक राजकारण्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा तर दिलाच नाही परंतु त्यांना जीएसटी यांच्या माध्यमातून टॅक्स वगैरे लावून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे तळपट वाजवले. जर शेतकरी राजा हा पारंपारिक किंवा जुन्या पद्धतीने सेंद्रिय शेती करण्यात सुरुवात केली तर शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र तेवढेच खरे आहे.