Home नांदेड खताच्या वाढलेल्या किंमती कमी करा.खता-बियाण्यांचा लॉकडाऊनमध्ये काळाबाजार होणार नाही,यासाठी यंत्रणा राबवा:-शिवशंकर पाटील...

खताच्या वाढलेल्या किंमती कमी करा.खता-बियाण्यांचा लॉकडाऊनमध्ये काळाबाजार होणार नाही,यासाठी यंत्रणा राबवा:-शिवशंकर पाटील कलंबरकर

175

राजेंद्र पाटील राऊत

खताच्या वाढलेल्या किंमती कमी करा.खता-बियाण्यांचा लॉकडाऊनमध्ये काळाबाजार होणार नाही,यासाठी यंत्रणा राबवा:-शिवशंकर पाटील कलंबरकर
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

यावर्षीपासून खताच्या डीएपी,10:26:26 व 12:32:16 या कंपन्यांनी प्रति 50 किलो बॅगमागे 700 रुपयांची वाढ करण्याचे घोषित केले आहे.एकावर्षात प्रतिबॅगमागे 700 रुपयांची वाढ ही सरळसरळ शेतकऱ्यांची लूट आहे.आणि ही वाढ शासनाने रद्द केली पाहिजे.लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन,खत-बियाण्यांमध्ये मोठा काळाबाजार होण्याची शक्यता आहे.हा काळाबाजार होऊ नये,यासाठी यंत्रणा राबविण्यात आली पाहिजे,अशी मागणी कृषिमंत्र्यांकडे कृषी कार्यालयामार्फत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केली आहे.
गेले वर्षी पेरणीपूर्व लॉकडाऊन होते.त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे आले.शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळाल्यामुळे दुबार पेरणी करावी लागली.काही शेतकऱ्यांना तिहेरी पेरणीचा खर्च उचलावा लागला.बोगस बियाण्यांचे प्रशासनाने पंचनामे केले.आजही ते पंचनामे कार्यालयात धूळ खात पडले आहेत.त्याची कोणतीही भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही.आणि ज्या कंपन्यांनी बोगस बियाणे बाजारात घेऊन आले.त्यांचे बियाणे रद्द केले नाही.म्हणून,शेतकऱ्यांना यावर्षी बोगस बियाण्यांचा सामना करावा लागू नये,यासाठी पेरणीपूर्व यंत्रणा राबविण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
लोकडाऊनच्या सावटाखालीच पेरणी होण्याची शक्यता आहे.आणि पेरणीमधील शेतकऱ्यांच्या खत-बियाण्यांची गरज लक्षात घेऊन,मोठ्या प्रमाणात खत-बियाण्यांचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे.खत-बियाण्यांचा काळाबाजार होऊ नये,यासाठी यंत्रणा राबविण्यात आली पाहिजे अशी मागणी कृषिमंत्री कार्यालयाकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केली आहे.

Previous articleअमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कोरोणाकाळात ठरतेय वरदान
Next articleराजधानीचे अजमीर सौंदाणे …! माझं गांव;माझा अभिमान!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.