Home मुंबई अर्थमंत्री अजितदाद पवार यांनी मांडला वस्तुनिष्ठ व प्रामाणिक अर्थसंकल्प ; सार्वजनिक बांधकाममंत्री...

अर्थमंत्री अजितदाद पवार यांनी मांडला वस्तुनिष्ठ व प्रामाणिक अर्थसंकल्प ; सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण

630

राजेंद्र पाटील राऊत

अर्थमंत्री अजितदाद पवार यांनी मांडला वस्तुनिष्ठ व प्रामाणिक अर्थसंकल्प ; सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण

राजेश एन भांगे /युवा मराठा न्युज नेटवर्क

कोरोनाच्या महामारीमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती विपरित आहे व उत्पन्नाचे स्त्रोत कमी झालेले आहेत.

केंद्र सरकारचे भरीव सहकार्य तर सोडाच पण राज्याच्या हिस्स्याचे पैसेही वेळेवर मिळत नाही.
अशा परिस्थितीतही एक चांगला, वस्तुनिष्ठ असा अर्थसंकल्प मांडल्या बद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार हे अभिनंदनास पात्र आहेत.

तर कुठेही बडेजाव नाही, पोकळ घोषणा नाहीत आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा, शेतकरी, महिला तसेच इतर गरजू घटक व क्षेत्रांसाठी आवश्यक त्या तरतुदी करण्याचे काम या अर्थसंकल्पात झाले आहे व त्याच अनुषंगाने महाराष्ट्राच्या सर्व विभागांना व घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे.

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या ७ हजार कोटी रूपयांच्या नांदेड – जालना महामार्गाची अर्थसंकल्पात घोषणा केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
असे यावेळी बोलताना नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

Previous articleप्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार अर्थसंकल्प 🛑
Next articleस्टेट बँक ऑफ इंडियाचे रोखपाल बनसोडे सेवानिवृत्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.