Home गडचिरोली भुमका पुरुष बचत गटाच्या स्नेहमिलन सोहळ्यात आमदार मिलिंद नरोटे यांचा सत्कार —...

भुमका पुरुष बचत गटाच्या स्नेहमिलन सोहळ्यात आमदार मिलिंद नरोटे यांचा सत्कार — डॉ. नामदेवराव उसेंडी यांची विशेष उपस्थिती

102

आशाताई बच्छाव

1002168250.jpg

भुमका पुरुष बचत गटाच्या स्नेहमिलन सोहळ्यात आमदार मिलिंद नरोटे यांचा सत्कार — डॉ. नामदेवराव उसेंडी यांची विशेष उपस्थिती

कनेरी,/गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ:
भुमका पुरुष बचत गट, गडचिरोली यांच्या वतीने कनेरी येथे पारिवारिक स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि गटाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे आमदार मिलिंदजी नरोटे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष औचित्य प्राप्त झाले.

कार्यक्रमात आमदार नरोटे यांनी भुमका पुरुष बचत गटाच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, “समाजातील एकोपा आणि स्नेह वाढविणारे असे उपक्रम सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देतात.”

डॉ. नामदेवराव उसेंडी यांनीही मार्गदर्शन करताना म्हटले की, “अशा सामाजिक कार्यक्रमांमुळे परस्पर संवाद वाढतो आणि एकात्मतेची भावना दृढ होते.”

गटाचे पदाधिकारी व सदस्यांनी उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांनी सर्व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि भविष्यातही असे समाजाभिमुख उपक्रम राबवण्याचे आवाहन केले.

Previous articleकापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरु करून सीसीआयच्या जाचक अटी रद्द करा – जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
Next articleराष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनानिमित्त आरोग्याची जबाबदारी घेऊया – डॉ. नामदेवराव उसेंडी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.