Home जालना पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून जालना शहरवासियांना सतर्कतेचे...

पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून जालना शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन

49

आशाताई बच्छाव

1002004119.jpg

पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर
माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून
जालना शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन
दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना केले आवाहन
जालना, दि. २७(प्रतिनिधी दिलीप बोंडे)- मागील काही दिवसांपासून जिल्हाभर प्रचंड
मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होवून जिल्ह्यासह जालना शहरातील नागरिकांचे
जनजीवन अत्यंत विस्कळीत झाले आहे. अशी परिस्थिती असतांना आज २७ सप्टेंबर
रोजी पुन्हा हवामान खाते व प्रशासनाच्या वतीने पुढील दोन दिवसांसाठी
अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. या पार्श्वभुमीवर शिवसेना (उध्दव
बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष भास्करराव
अंबेकर यांनी जनतेच्या काळजीपोटी नागरिकांना अतिवृष्टीपासून सतर्क
करण्यासाठी जालना शहरात दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना
खबरदारीच्या सुचना दिल्या.
शिवसेना जिल्हाप्रमुख अंबेकर हे सातत्याने वेगवेगळ्या अडीअडचणीच्या
प्रसंगी नागरिकांना मदत करत असतात. दोन दिवसांपूर्वीच शहरातील अनेक बाधित
वस्त्यांमध्ये अन्नधान्यांच्या किट वाटप त्यापुर्वी पुरीभाजी वाटप,
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप असे
उपक्रम राबवून नागरिकांना दिलासा देण्याचे काम करीत आहे. कोरोना काळातही
जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी दोन ऑटो रिक्षांना भोंगे लावून शहरातील
नागरिकांना घाबरुन न जाता सुरक्षेतच्या संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन
केले होते.
०००००००
फोटो ओळी……
७-पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव
अंबेकर यांच्याकडून दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून अतिवृष्टीसंदर्भात जालना
शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन केले.
०००००००००००

Previous articleतालुकास्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धेत आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी सोफियान कलीम शेख याने पटकावला प्रथम क्रमांक
Next articleआधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.