Home नाशिक सौरऊर्जेवर चालणाऱ्या मल्टीपरपज कोल्ड स्टोरेजमुळे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

सौरऊर्जेवर चालणाऱ्या मल्टीपरपज कोल्ड स्टोरेजमुळे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

224

आशाताई बच्छाव

1001808912.jpg

सौरऊर्जेवर चालणाऱ्या मल्टीपरपज कोल्ड स्टोरेजमुळे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

पुणे येथील कांदा धोरण समितीच्या बैठकीत सौ. सुवर्णाताई जगताप यांचे प्रतिपादन

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे

राज्यातील कांदा दरात स्थिरता राखणे तसेच शेतकरी, ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे समतोल हित जोपण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या कांदा धोरण समितीची तिसरी बैठक गुरूवार, दि. 07 ऑगस्ट, 2025 रोजी राष्ट्रीय कांदा आणि लसुण संशोधन केंद्र, राजगुरुनगर, जि. पुणे येथे संपन्न झाली. या बैठकीस राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष मा. पाशा पटेल अध्यक्षस्थानी होते.
सदर बैठकीत लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्या सौ. सुवर्णा जगताप यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या मल्टीपरपज कोल्ड स्टोरेजच्या विषयावर महत्त्वपूर्ण संकल्पना मांडणी करून असे सांगितले की, पारंपारीक कांदा चाळीत साठवलेला कांदा उष्णता, आर्द्रता व कीटकांमुळे खराब होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. या समस्येवर उपाय म्हणून सौरउर्जेवर चालणाऱ्या आधुनिक मल्टीपरपज कोल्ड स्टोरेजची उभारणी करावी. जेणेकरून शेतकऱ्यांचे कांद्याचे नुकसान टाळण्यास मदत होईल. तसेच या सुविधेमुळे कांद्याबरोबरच इतर फळे व भाजीपालाही सुरक्षितपणे साठवता येईल.कोल्ड स्टोरेजमध्ये नियंत्रित तापमान व आर्द्रतेमुळे शेतीमाल जास्तीत जास्त दिवस टिकवता येतो. त्यामुळे शेतकरी बाजारभाव वाढेपर्यंत शेतीमाल विक्रीसाठी थांबू शकतात आणि आपल्या शेतीमालाचे योग्य मूल्य मिळवू शकतात. महत्वाचे म्हणजे हे कोल्ड स्टोरेज सौरऊर्जेवर चालत असल्यामुळे विद्युत खर्चात लक्षणीय बचत होईल. तसेच पारंपारिक विजेवर चालणाऱ्या कोल्ड स्टोरेजच्या तुलनेत हे अधिक पर्यावरणपूरक व किफायतशीर आहे.
शासनाच्या विविध योजना व अनुदानांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी पारंपारीक साठवणुक पध्दतीचा त्याग करून या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करावा असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. तसेच अशा प्रगत सुविधा ग्रामिण भागात उपलब्ध झाल्यास शेती अधिक शाश्वत आणि नफ्याची ठरू शकते असा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.सदर बैठकीस राज्य कृषि मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, लासलगांव बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप, शेतकरी प्रतिनिधी दिपक पगार, कला बायोटेकचे पदाधिकारी, निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग, सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनचे (गोदाम) कमांडर अजय जादु, पणन मंडळाचे सदस्य सुहास काळे आदि उपस्थित होते.

Previous articleश्रीक्षेत्र पाचोरे बु येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ
Next articleनरडाण्यात ‘डिफेन्स हब’ व्हावा मंत्री जयकुमार रावल यांची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.