Home नाशिक शेवरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी – तातडीने उपचारासाठी मालेगाव येथे हलवले

शेवरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी – तातडीने उपचारासाठी मालेगाव येथे हलवले

239

आशाताई बच्छाव

1001778356.jpg

शेवरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी – तातडीने उपचारासाठी मालेगाव येथे हलवले               सटाणा,दावल पगारे तालुका प्रतिनिधी 

ता. बागलाण (जि. नाशिक) येथील मौजे शेवरे गावात बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. श्रीमती मनीषा राजेंद्र सोनवणे, वय 32 वर्षे, रा. शेवरे, ह्या दि. __ रोजी सकाळी अंदाजे 12 वाजता श्री कुंभार या शेतकऱ्याच्या शेतात मका निंदणी करण्यासाठी मजुरीस गेल्या होत्या.

याच दरम्यान, अचानक बिबट्याने हल्ला करून त्यांच्या कपाळावर, भुवईवर, गालावर व हातावर पंज्याने जखमा केल्या. तात्काळ त्यांना अंतापूर येथील खैरनार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर 23 टाके टाकून प्राथमिक उपचार करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी श्री डी. एम. शरमाळे, वनपाल श्री गवळी, वनरक्षक श्री संदीप गायकवाड, श्री निलेश कोळी, श्री माणिक मोरे, श्री देवकाटे व वनमजूर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी महिलेला ताहराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारांसाठी त्यांना मालेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने मदतकार्य करून जखमीस शासकीय आरोग्य सेवेमार्फत तातडीने उपचार मिळवून दिले. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून वनविभाग पुढील आवश्यक कार्यवाही करत आहे.

Previous articleEpaper Yuva maratha – 2 August
Next articleपत्रकार राजेंद्र उर्फ बाळासाहेब आहेर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.