Home पुणे सात जणांच्या पार्टीला रेव्ह म्हणतात का? एकनाथ खडसेंचा सवाल

सात जणांच्या पार्टीला रेव्ह म्हणतात का? एकनाथ खडसेंचा सवाल

82
0

आशाताई बच्छाव

1001762768.jpg

सात जणांच्या पार्टीला रेव्ह म्हणतात का? एकनाथ खडसेंचा सवाल
पुणे :निवासी संपादक उमेश पाटील
पुण्यात 26 जुलैच्या रात्री छापेमारीत एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. खराडी भागात हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती असा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, आज पत्रकार परिषेद घेत खडसे यांनी पुणे पोलीस प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.
नेमकं काय म्हणाले खडसे?
पोलिसांच्या कारभाराविषयी माझ्या मनात काही शंका आहेत. तिथे पाच सात जणांची पार्टी चालू होती. तिथे कोणतेही संगीन नाही. नृत्य नाही. कोणताही गोंधळ नाही. एका घरात पाच- सात जण पार्टीत होते. त्याला तुम्ही रेव्ह पार्टी कसे म्हणता? राज्यात कुठेही पाच- सात जण मिळून पार्टी करत असतील तर त्याला रेव्ह पार्टी म्हणणार का? रेव्हा पार्टीची नेमकी व्याख्या काय ती पोलिसांनी स्पष्ट करावी. त्यामुळे रेव्ह पार्टी आयोजित केली म्हणून माझ्या जावयाची बदनामी करण्याचे प्रयोजन काय? असे सवाल खडसेंनी यावेळी उपस्थित केले.

तसेच, माझ्यावर साध्या वेशातील पोलिस पाळत ठेऊन असल्याचेही खडसेंनी यावेळी दावा केला आहे. माझी पत्रकार परिषद सुरु असताना साध्या वेषातील पोलीस आले. माझ्या घराच्या बाहेर आत्ताही पोलीस आहेत. माझ्या छातीवर बसण्याचा प्रयत्न करतायेत. माझा सरकारला सवाल आहे की, माझ्यावर पाळत का ठेवली जात आहे? माझा आरोप आहे की रेव्ह पार्टी हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे.

Previous articleशुभ डेव्हलपर्सने ‘शुभ वेदा’ लाँच केले, पीसीएमसीमधील अल्ट्रा-लक्झरी जीवनशैलीसाठी उभा राहणारा लँडमार्क
Next articleभुसावळ येथे पर्यावरणाच्या संतुलनासाठी सीड बॉल उपक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here