आशाताई बच्छाव
सावधान प्रवास बेतनार जीवावर, ८५. ४२की. मी., रस्ते १५ पुल नादुरुस्त, शासन स्तरावर प्रस्ताव धूळ खात :५. ६0 कोटीची निधी मिळेना. दैनिक युवा मराठा पी एन . देशमुख जिल्हाप्रतिनिधी. अमरावती. अमरावती जिल्ह्यात प्रवास करताना आता नागरिकांना प्रचंड खबरदारी बाळगावी लागणार आहे जिल्ह्यातील जवळपास ८५. ४२की. मी. चे रस्ते आणि १५ पूल खराब नादुरुस्त आहे. त्यामुळे येथून प्रवास करणे जीवावर बेतू शकणार आहे ग्रामीण भागातील सततच्या पावसामुळे अनेक रस्ते व १५ पुल खराब झाले आहे मात्र बांधकाम विभागाकडे शासनाकडून निधी उपलब्ध नसल्यामुळे कोणतीही दुरुस्ती काम सुरू झालेले नाही मागील चार वर्षापासून जिल्हा परिषद शासनाकडे रस्ते व पूल दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करीत आहे पण अद्यापही निधी मिळाला नाही ८५…४२ किलोमीटर रस्ते व फुल दुरुस्तीसाठी किमान ५. ६0 कोटीची गरज आहे तरीही शासनाकडून निधी म्हणून झालेली नाही त्यामुळे कामे अडत आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून निधी मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून निधी मिळण्याची आशा करतो होत आहे यांनाही सतत पावसामुळे अनेक तालुक्यातील ग्रामीण रस्ते खरडुन गेले आहेत. परंतु शासनाकडून सर्वेक्षणाची कुठलेही आदेश न मिळाल्याने कुठलीही कार्यवाही सुरू झालेले नाही मागील वर्षी स्थापना कडून न मागता ही बांधकाम विभागाचेकाम होते. त्यानुसार रस्ते व पूल दुरुस्तीसाठी ७ कोटी मागणी करण्यात आली होती. परंतु अद्याप एक पहिली पैसा ही मिळाला नाही. २023-202४ मध्ये८५की. मी. व१५ पूल दुरुस्तीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे मात्र निरसाही शासनाच्या भूमिकेमुळे सध्या या रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ही पाठपुरावा केला जात आहे मात्र या प्रस्तावाकडे शासन स्तरावर दुर्लक्ष केले जात आहे. डीपीडीसी तून मिळणार का निधी शासनाकडून पूर हनी मुळे खराब झालेले रस्ते व पूल दुरुस्तीसाठी निधी मिळाला नसल्याने रस्ते व पुलाचे कामे होऊ शकली नाही परिणामी उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील रस्त्याची कामे करता येणार आहे यासाठी बीपीसीच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे या निधीच्या माध्यमातून या ठिकाणच्या कामाला सुरुवात होऊ शकेल यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे दृष्टीक्षेपात आकडेवारी नादुरुस्त रस्ते खराब पूल १५. आवश्यक निधी ५. ६0 कोटी पूल दुरुस्तीसाठी निधी 1.४0 या रस्त्यावरील प्रवास जीवघेणा मागील चार वर्षापासून जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग क्रमांक एक व दोन चांदूर रेल्वे,मोर्शी, अचलपूर,दर्यापूर व धारणी या उपविभागातील रस्ते व पूल सन २0२३–२0२४ मध्ये खराब झाले आहेत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून ग्रामीण भागातील८५. ४२ किलोमीटरचे रस्ते व १५ पुलाच्या दुरुस्तीचे तसेच नव्याने बांधकाम बाबत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र त्याबाबत दखल घेण्यात आलेली नाही.