Home उतर महाराष्ट्र नगरसेविका स्नेहल खोरे यांच्या प्रयत्नांना यश; नाल्याच्या भूमिगतकरणासह विविध मागण्या मान्य

नगरसेविका स्नेहल खोरे यांच्या प्रयत्नांना यश; नाल्याच्या भूमिगतकरणासह विविध मागण्या मान्य

28
0

आशाताई बच्छाव

1001699901.jpg

नगरसेविका स्नेहल खोरे यांच्या प्रयत्नांना यश; नाल्याच्या भूमिगतकरणासह विविध मागण्या मान्य

पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण; जनतेच्या समस्यांवर तातडीने निर्णय

श्रीरामपूर (प्रतिनिधी दिपक कदम) – महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागांतील महत्त्वपूर्ण विकासकामांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी प्रभागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्या मांडण्यात आल्या असून, नगरसेविका सौ. स्नेहल केतन खोरे व मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे पाटील यांनी दिलेल्या निवेदनावर ना.विखेंनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी सभापती दिपक पटारे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, जि.प.सदस्य शरद नवले, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, रवी पाटील, वैशाली चव्हाण, अभिषेक खंडागळे, संजय गांगड, मनोज लबडे, राजू आदिक, सोमनाथ गांगड आदी उपस्थित होते.
शहरातील सांडपाण्याचा उत्सव मंगल कार्यालय ते महाले पोदार स्कूल दरम्यानचा नाला (चर) हा परिसरातील प्रमुख समस्या आहे. या नाल्याचे सिमेंट काँक्रेटीकरण करून भूमिगत करण्याची मागणी नगरसेविका सौ. स्नेहल खोरे यांनी केली. पालकमंत्री विखे पाटील यांनी तात्काळ या मागणीची दखल घेत उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक किरण सावंत व मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना प्रस्ताव सादर करून त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.
यासोबत नगरसेविका स्नेहल खोरे यांनी भोंगळ वस्तीतील पाणीपुरवठा पाईपलाईन जोडण्याची, पूर्णवादनगर टीपी रिझर्व्हेशन काढण्याची आणि प्रभागासाठी वाढीव निधी मंजूर करण्याची विनंती केली. या सर्व मुद्द्यांवर पालकमंत्री विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना यावर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पूर्णवादनगरमधील टीपी रिझर्व्हेशनचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यात अडचणीमुळे स्थानिकांना घरकुल अनुदान मिळण्यास अडथळे येत आहेत. खोरेंच्या प्रयत्नाने येथील डीपी रिझर्व्हेशन रद्द झाले आहे. प्रभागाच्या विकासासाठी केतन खोरे व स्नेहल खोरे या सातत्याने कार्यरत असून त्यांच्यामुळे शहर विकासात हा प्रभाग प्रथमस्थानी आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी विजय पाटील, सुदर्शन शितोळे, विजयकुमार शर्मा, मनोज होंड, मनोज नागरे, विवेक भोईर, अनिल उनवणे, प्रमोद कु-हे, मोघले साहेब, बी.एम.पवार, पंकज बनकर, विशाल रुपनर, तुषार चांडवले, महिला शहराध्यक्ष पुष्पलता हरदास, पूजा चव्हाण, सीमा पटारे, अलका राऊत, वर्षा भोईर, अनिल पंडित, राहुल सागडे, सीमा पाठक, लता जगताप, मंगल शितोळे, शुभांगी सातपुते, रेखा होते, नूतन माळवे, अग्रवाल भाभी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleनाशिकमध्ये तोतया पोलिसांनी घातला धुमाकूळ
Next articleविद्यार्थ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या क्लासवर कारवाई करावी रिपाईची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here