आशाताई बच्छाव
.. दख्खन केदारण्य” वृक्षारोपण कार्यक्रम मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या ऑनलाइन उद्घाटन
कोल्हापूर. (अविनाश शेलार प्रतिनिधी यांजकडून ) महाराष्ट्राचे आराध्य दैवत वाडी रत्नागिरी (जोतिबा डोंगर) येथे आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून “दख्खन केदारण्य” वृक्षारोपण कार्यक्रम मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नामदार नितीनजी गडकरीही ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते…
वाडी रत्नागिरी डोंगर परिसरातील तीस एकर क्षेत्रामध्ये केदार विजय ग्रंथात नोंद असलेल्या दहा हजार वेगवेगळ्या भारतीय झाडांची लागवड करून दुर्मिळ “दख्खन केदारण्य” साकारत आहे. आपल्या इतिहासामध्ये, संस्कृतीमध्ये आणि आपल्या आस्थांमध्ये निसर्गाला सर्वाधिक महत्त्व दिलं आहे. आपले सर्व देव देवता निसर्गाशी साधर्म राखणारे आणि निसर्गाचे संवर्धन करणारे आहेत. निसर्गाची सेवा केल्याशिवाय आपला नमस्कार कोणत्याच देवतांपर्यंत पोहोचत नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी केले…
तसेच शाहूवाडी – पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी चांगल्या प्रकारे जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा तयार करून घेतला असून २५९ कोटी रुपयांच्या कामाला नुकतीच राज्यस्तरीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामध्ये प्रमुख उद्देश हा जोतिबा डोंगर हिरवागार करणे आहे. या आराखड्याची अंमलबजावणी करीत असताना आवश्यक निधी नियोजन विभागाकडूनच मिळावा अशी मागणी आली आहे, आणि ती येत्या काळात पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी केलेल्या दुसऱ्या मागणीप्रमाणे या विकास आराखड्याची अंमलबजावणी प्राधिकरणामार्फतच होण्यासाठी लवकरच प्राधिकरण स्थापनेसही मंजुरी देऊ अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी ऑनलाइन बोलताना दिली…
तसेच श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर महाराष्ट्र,आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यासह अनेक राज्यातून भाविक – भक्त येतात त्यांची चांगली सोय व्हावी तसेच येथील वातावरणही उल्हासित रहावे या दृष्टीनेच विकास आराखड्याची चांगली अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे.पन्हाळगडावरील झालेल्या चांगल्या कामाप्रमाणेच याही विकासाराखड्यातून आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) हे चांगले काम करतील आणि त्यांच्या सोबत निश्चितच शासन पूर्णपणे पाठीशी राहील असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले…
तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांनी वृक्षारोपण कार्यक्रमास शुभेच्छा देऊन समाज जीवन सुरळीत चालण्यासाठी इथिक्स, इकॉनॉमिक्स, इकॉलॉजी आणि एनवोर्मेन्ट या तीन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०७० सालापर्यंत भारत देश कार्बन न्यूट्रल देश करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले पर्यावरणपूरक कार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. “दख्खन केदारण्य” सारख्या प्रकल्पांची उभारणी महत्वाची असल्याचे सांगत त्यांनी विविध उदाहरणांमधून पर्यावरण विषयक महत्त्व पटवून दिले…
अनेक वर्षांपासूनचे जोतिबा विकास आराखड्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.तसेच या ठिकाणी सर्व वनखात्याच्या जमिनीवर शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच चार हजार वर्षांपूर्वीचे वनवैभव पुन्हा या ठिकाणी उभे करायचे आहे. हे करीत असताना तसेच मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना ग्रामस्थांशिवाय कुठल्याही प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार नाही. यासह स्थापन करण्यात येत असलेल्या प्राधिकरणातही ग्रामस्थांचा सहभाग असेल व त्यांचे मत विचारात घेतले जाईल असे आश्वासन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी यावेळी दिले…
तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या मनोगतामध्ये “दख्खन केदारण्य” या प्रकल्पास शुभेच्छा देऊन या पद्धतीने जिल्ह्यात इतरही ठिकाणी अशाच प्रकारचे उपक्रम राबवण्याचा संकल्प केला.खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे विविध विकास प्रकल्पांना मंजुरी दिल्याबद्दल आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यासंदर्भात उपस्थित मान्यवरांचे आभार मानून विकास आराखडा शास्त्रीय दृष्टिकोनातून, पर्यावरण तज्ञांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येईल असे सांगितले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला आर्किटेक्ट संतोष रामाणे यांनी आराखडा निर्मिती प्रक्रिया व त्याचे महत्त्व उपस्थितांना सविस्तर सांगितले…
यावेळी कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्हाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर ऑनलाइन तर कार्यक्रमस्थळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.अशोकराव माने (बापू) यांच्यासह पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता,मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयेन,राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता संजय कदम,प्रांताधिकारी समीर शिंगटे,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान सचिव शिवराज नाईकवाडे,गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील,गोकुळ दूध संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर),वारणा दूध संघाचे व्हा.चेअरमन एच.आर.जाधव (आण्णा),माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मोरे,माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांच्यासह आदी मान्यवर व वाडी रत्नागिरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…
आमदार विनय रावजी कोरे यांच्या मतदारसंघांमध्ये शिंपे तालुका शाहूवाडी ग्रामपंचायतीच्या 30 एकर मधील वृक्षतोड प्रचंड प्रमाणात झाले असताना या ठिकाणचे आमदार विजयरावजी कोरे ज्या ठिकाणी विकास झाला आहे त्या दख्खांचा राजा जोतिबा येथे वृक्षारोपण करत आहे मग तालुक्यातील वृक्षतोड भयानक होत असताना आमदार विनय राव कोरे गप्प का? ? वृक्षतोड करणाऱ्या उद्धट महसूल अधिकाऱ्यांच्या वर आणि महसूल मधील अधिकाऱ्यांच्या वर कारवाई का करत नाहीत अशी चर्चा होती