आशाताई बच्छाव
पुणे (राजगुरूनगर) शहरात ‘खान्देश विकास प्रतिष्ठाण वृक्ष टीम’चा ऐतिहासिक ‘ वृक्षरोपण’ महामोहीम:
निसर्ग संवर्धनासाठी राजगुरूनगर करांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
(पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
राजगुरूनगर:- रविवार, ८ जून २०२५ रोजी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि राजगुरूनगर शहराला अधिक हिरवेगार बनवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या ‘ वृक्ष टीम’ने आज एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक ‘ वृक्षरोपण’ महामोहीम यशस्वीपणे राबवली. राजगुरूनगर परिसरातील विविध क्षेत्रात राबवलेल्या मोहिमेत शहरातील असंख्य नागरिकांनी, सर्व सामाजिक आणि व्यावसायिक स्तरांतील व्यक्तींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत निसर्गाप्रती आपली अढळ निष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.आज सकाळी लवकर सुरू झालेल्या या विराट कार्यक्रमासाठी राजगुरूनगर शहरातील कानाकोपऱ्यातून खान्देश विकास प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व धुळे,नंदुरबार, जळगाव,नाशिकहून आलेल्या खान्देशकर बांधव व राजगुरुनगर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. यामध्ये अनुभवी जेष्ठ, मार्गदर्शक, उत्साही विद्यार्थी, शहरातील प्रमुख व्यापारी, तसेच ज्येष्ठांपासून ते अगदी लहान मुलांपर्यंत सर्वांनी हिरारीने सहभाग घेतला.प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाट्याला आलेल्या वृक्षरोपण करण्याचे काम हाती घेतले
हा केवळ एक कार्यक्रम नसून, निसर्गाच्या संवर्धनासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाने एकत्र येऊन उभारलेले एक ‘जनआंदोलन’ होते. या महामोहिमे अंतर्गत
इत्यादी ,अनेक असे वृक्षरोपण करण्यात आले वृक्ष टीम’च्या सहकारी,मार्गदर्शक यांनी संवादातून संदेश दिला की या उपक्रमामुळे आघामी काळात या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होऊन राजगुरूनगर ची पर्यावरणीय समृद्धी कैकपटीने वाढेल, असा ठाम विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
‘ वृक्ष टीम’ने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उचललेले हे पाऊल अत्यंत दूरदृष्टीचे आणि प्रशंसनीय आहे. या उपक्रमाने केवळ वृक्ष रोपण केले नाही, तर राजगुरूनगर कारांच्या मनात पर्यावरणाप्रती जबाबदारी आणि प्रेमाची बीजे पेरली आहेत. अशा प्रकारच्या लोकसहभागातून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळेच शहराच्या पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि भावी पिढ्यांसाठी एक हरित आणि निरोगी वारसा निर्माण होईल, असा दृढ विश्वास यावेळी अनेक उपस्थितांनी व्यक्त केला. ही मोहीम केवळ एक तात्पुरता कार्यक्रम नसून, नागरिक आणि पर्यावरणाप्रती असलेली त्यांची सामूहिक जबाबदारी आणि बांधिलकी अधोरेखित करणारी एक मैलाचा दगड ठरेल, अशी चर्चा करण्यात आहे. ‘ वृक्ष टीम’च्या या कार्याचे सर्वांनी अभिनंदन केले आणि यापुढेही शहरांत यातून प्रेरणा घेऊन असे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा युवा नेतृत्व श्री शशिकांत खलाणे व खान्देश विकास प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केले…