Home जालना वरुड बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

वरुड बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

278
0

आशाताई बच्छाव

1001563273.jpg

वरुड बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

जाफराबाद प्रतिनीधी मुरलीधर डहाके

सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील वरूड बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. वरूड बुद्रुक पासुन जवळच असलेल्या कोनड शिवारातील एका शेततळ्यात बुडून तीनही मुले एकाच कुटुंबातील भावंडांचा द्रूदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार 3 जून रोजी सकाळी सकाळी उघडकीस आली. या घटने मुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे .
तसेच याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,जोशी कुटुंब सोमवार दिवशी 2 जून रोजी डोलखेडा येथील ओंकारेश्वर महादेव मंदीर येथे दर्शनासाठी गेले होते. यावेळी कुटुंबातील यश अनिल जोशी(14), दीपाली रमण जोशी (9), रोहन रमण जोशी (7), ही तीन भावंडे बेपत्ता झाली होती . कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेऊन ही भावंडे सापडली नाही . त्यामूळे त्याच्या कुटुंबीयांनी जाफराबाद पोलिस स्टेशनला तक्रार दीली होती. त्याच दरम्यान मंगळवार सकाळी कोनड शिवारातील सुभाष परीहर यांच्या शेतातील शेततळ्यात या तीनही भावंडांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिक शेतकऱ्याला आढळून आले. लगेच पोलिसांना कळविण्यात आले त्यानंतर मुलांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले.
यादरम्यान ही तीनही भावंडे या शेततळ्यात कशी गेली, त्यांचा मृत्यू कसा झाला अद्याप काहीही समोर आले नाही . या घटनेचा पुढील तपास जाफराबाद पोलीस स्टेशन करीत आहे. एकाच कुटुंबातील तीन भावंडांच्या मृत्यू मुळे जाफराबाद तालुका तसेच जिल्हाभरातून हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here