आशाताई बच्छाव
अमरावती जिल्ह्यातील रुक्मिणी मातेच्या माहेरची मानाची प्रथम पालखी रवाना: विदर्भातील कौंडण्यपूर ते पंढरपूर ४० दिवसाच्या वारीला सुरुवात. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती (कौंडण्यपूर). अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान तर्फे आयोजित पालखी सोहळा पंढरपूरला प्रस्थान झाली आहे. शनिवारी ३१ मे रोजी या सोहळ्याला सुरुवात झाली. ही पालखी सोहळा ४० दिवसाची असेल. विदर्भाची पंढरी म्हणून अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपुरला ओळखल्या मानाच्या पालखी पैकी विदर्भातील एकमेव पालखी म्हणजे कौंडण्यपूर येथील आई रुक्मिणीच्या माहेरची पालखी वर्षापासून ही चालत आलेली पंढरपूर पालखीची परंपरा आहे. या पालखीचे पूजन आमदार राजेश वानखडे व त्यांची पत्नी आरती वानखडे यांच्यासह वारकऱ्यांनी पूजन केली आहे. यावेळी टाळ मृदंग गजरात विदर्भाची पंढरी कौंडण्यपुर नगरी दुमदुमली होती. शनिवारी दुपारी ४ वाजता आमदार राजेश वानखडे यांच्या हस्तेआई रुक्मिणी मातेच्या पादुकांचे विविध पूजन करण्यात आले त्यानंतर गावातून पालखी मार्गक्रमण करत गावच्या वेशी पर्यंत आली. नंतर वारकऱ्यांनी पादुका पोहोचून पंढरपूरकडे प्रस्थान रवाना करण्यात आली. ही पालखी अमरावती, कारंजा लाड, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर या जिल्ह्यातून प्रवास करेल. या प्रवासात पालखी दररोज अंदाजे १५ते२० किलोमीटर प्रवास पालखी व वारकऱ्यासह करत पंढरपूर कडे प्रस्थान दिवस पायदळ प्रवास करत ही पालखी पंढरपुरात दाखल झाल्यावर परतीच्या प्रवासानंतर या पालखीचे कौंडण्यपुरात स्वागत केल्या जाते.११ जुलाई रोजी ४ वाजता कौंडण्यपुरात दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा होणार आहे. यासाठी विठ्ठल–रुक्मिणी संस्थान, कौंडण्यपूर मंदिराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवासह विश्वस्त परिश्रम घेत आहेत. या पालखी सोहळ्यात छाया दंडाले, प्रदीप गौरखेडे, नगरसेवक अनिल थुल., प्रवीण बडकस, दिलीप मेहकर, अतुल ठाकरे, संदीप सोटे, अंकुश पुंडेकर सह संस्थेचे पदाधिकारी वारकरी भजन मंडळी भक्तगण उत्साहात सहभागी झाले होते.