आशाताई बच्छाव
“येळ कोट येळ कोट जय मल्हार !” बुलढाण्यात गुंजला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जयघोष ! -भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेंच्या नेतृत्वात निघाली दुचाकी अभिवादन रॅली !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती दिनी काल ३१ मे रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आ. विजयराज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोटरसायकल वरून निघालेल्या अभिवादन रॅलीने परिसर दणाणून गेला होता. स्थानिक तहसील चौक येथील माता अहिल्यादेवी स्मारक येथे स्मारक समितीचे अध्यक्ष भाजपचे युवा नेते नंदू लवंगे यांच्या सर्व सहकारी व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोष पार पडला. सोबतच शहरातून युवा नेते नंदू लवंगे यांच्या संकल्पनेतुन भव्य मोटर सायकल रॅली काढण्यात आली व त्यानंतर पेठेतील श्रीराम महादेव मंदिर येथे महिला भगिनींच्या उपस्थितीत महाआरती करून त्यांच्या कार्याप्रती मानवंदना अर्पण करण्यात आली. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांची विशेष उपस्थिती होती. यावेळी माता अहिल्यादेवी यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे विजयराज शिंदे यांच्या हस्ते पूजन करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर शहराच्या मुख्य मार्गाने मोटरसायकल रॅली काढून माता अहिल्यादेवी यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. “येळ कोट येळ कोट जय मल्हार” या घोषणांनी शहर परिसर दणाणून गेला होता. माता अहिल्यादेवी ह्या भगवान महादेवांच्या निस्सीम भक्त होत्या. त्यामुळे मोटर सायकल रॅलीच्या समाप्ती नंतर पेठेतील श्रीराम मंदिर येथे भगवान महादेवांच्या पिंडीचे पूजन करून शंखनादाच्या गजरात महिला भगिनींच्या हस्ते भव्य महाआरती करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या “पुरोगामी इतिहासातील पहिल्या महिला शासक म्हणून अहिल्याबाई होळकर यांची ओळख आहे, सोबतच हिंदू धर्माच्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार व सरंक्षणाचे महत्वाचे कार्य त्यांनी केले त्यांचे समाजातील योगदान आणि त्यांचे पुरोगामी शासन आजही राज्यकर्त्यांना व खास करून महिला भगिनींना प्रेरणा देत आहे” असे प्रतिपादन केले. या कार्यक्रम प्रसंगी प्रा. विजय जोशी, भाजपचे युवा नेते नंदू लवंगे, जिल्हा सचिव चंद्रकांत बर्दे, माजी जि प सदस्य सुरेश सिनकर, मुन्नाजी बेंडवाल, मा नगरसेवक मंदार बाहेकर, अरविंद होंडे, वैभव इंगळे, मुन्ना बेगानी, मनसे नेते अमोल रिंढे, कामगार मोर्चाचे नेते विश्राम पवार, श्री अण्णासाहेब पवार, डॉ मधुसूदन सावळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विनायक भाग्यवंत, योगेश राजपूत, सोनू बाहेकर, माजी शहराध्यक्ष अनंता
शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष सौ स्मिताताई चेकेटकर, सौ वर्षाताई पाथरकर, सौ अलकाताई पाठक, सौ अंजलीताई परांजपे, माजी महिला जिल्हाध्यक्ष सौ सिंधुताई खेडेकर, किरण नाईक, सौ शोभाताई ढवळे, ऍड दशरथसिंग राजपूत, सागर चिंचोळकर, गजानन अवसरमोल, सतीश भाकरे पाटील, श्री टेंभिकर, पप्पू सोनकर, डॉ चाटे, डॉ अशोक भवटे, विठ्ठल नरोटे, राजेंद्र पवार, प्रदीप तोटे, विशाल ढवळे यांसह विविध क्षेत्रातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.