Home जालना उसाच्या दरात  यंदाही ‘समृद्धी’च वरचढ ! : शेतकऱ्यांना  २९७० रूपये एफआरपी देण्याची...

उसाच्या दरात  यंदाही ‘समृद्धी’च वरचढ ! : शेतकऱ्यांना  २९७० रूपये एफआरपी देण्याची कारखान्याची घोषणा  

80

आशाताई बच्छाव

1001536835.jpg

उसाच्या दरात  यंदाही ‘समृद्धी’च वरचढ ! : शेतकऱ्यांना  २९७० रूपये एफआरपी देण्याची कारखान्याची घोषणा
200 रुपयांचा दुसरा हप्ता लवकरच खात्यात होणार जमा :  चेअरमन सतीश घाटगे  

——————–
घनसावंगी/जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ: शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर देणारा साखर कारखाना म्हणून मराठवाड्यात ओळख निर्माण केलेल्या समृद्धी साखर कारखान्याने यंदाही उच्चांकी भावाची परंपरा कायम ठेवली आहे. गाळप हंगाम २०२४ -२५ मध्ये गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला २९७० रुपये प्रती मे. टन प्रमाणे  दर देण्याची घोषणा  कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी सोमवारी (दि. २६)  केली.  या घोषणेमुळे  शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठी मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

अंबड -घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाला योग्य मोबदला देण्यात समृद्धी साखर कारखाना मराठवाड्यात आघाडीवर राहत आला आहे. गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये  समृद्धी कारखान्याने गाळप  झालेल्या  शेतकऱ्यांच्या उसाला  एफआरपी पेक्षा ११० रुपये अधिक भाव  देत २ हजार ८०० रुपये प्रतीटन प्रमाणे  अंतिम बिल दिले.  तर गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये  देखील समृद्धी साखर कारखान्यात  गाळप झालेल्या उसाला  उच्चांकी दिला आहे.
आता गाळप गाळप हंगाम २०२४ -२५ मध्ये गाळप झालेल्या उसाला २९७० रुपये प्रती मे. टन भाव देण्याची घोषणा केली आहे.  पहिला हप्ता २५०० रुपये प्रती मे. टन प्रमाणे दिल्यानंतर लगेच दुसरा हप्ता 200 रुपये प्रती मे. टन प्रमाणे देण्यात येणारी असल्याची माहिती  समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी दिली आहे.  दुसऱ्या हप्त्याची रक्कम वाटप झाल्यांनतर तिसरा हप्ता देखील लवकर शेतकऱ्यांना देण्यात असल्याचे सतीश घाटगे यांनी सांगितले आहे. गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये  थेट २९७० रुपये प्रति मे. टन दराने एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

Previous articleसन्मान द्या आणि सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत
Next articleसंभाजी भिडे आणि सदावर्तेचा बोलवता धनी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुघल सम्राट औरंगजेबाला शक्य झाले नाही ते घडवण्याचा बालिश प्रयत्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.