Home बुलढाणा देऊळघाटातील देशी दारू विक्री बंद करा ! – अन्यथा एसपी ऑफिस समोर...

देऊळघाटातील देशी दारू विक्री बंद करा ! – अन्यथा एसपी ऑफिस समोर आमरण उपोषण करणार ! – रिजवान खान उस्मान खान यांचा इशारा !

22
0

आशाताई बच्छाव

1001529716.jpg

देऊळघाटातील देशी दारू विक्री बंद करा ! – अन्यथा एसपी ऑफिस समोर आमरण उपोषण करणार ! – रिजवान खान उस्मान खान यांचा इशारा !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- देऊळघाट गावातील अवैध देशी दारू विक्री बंद करण्याची मागणी पोलिसांना करून देखील दारू विक्री बंद होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते रिजवान खान उस्मान खान यांनी २६ मे पासून ग्रामस्थांसह एसपी ऑफिस समोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
रिजवान खान उस्मान खान यांनी
जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात
नमूद केले की, देऊळघाट हे मोठ्या लोकवस्तीचे गाव असून गावातून राज्य महामार्ग जातो. गावात लहान- मोठ्या दुकानांतून राजरोसपणे अवैधरीत्या देशी दारूची विक्री होत आहे. दारू विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढून तरुण पिढी व्यसनाधीन झाल्याचे दिसत आहे. गावात १ ते १२ वी पर्यंत शाळा असून देऊळघाट परिसरातील विद्यार्थी – विद्यार्थिनी शिक्षणासाठी येथे येतात त्यांचेकडे पाहून मद्य प्राशन केलेले अनेक तरुण त्यांची छेड काढत असल्याने कोणत्याही क्षणी गावातील कायदा व सुरक्षा बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावात एकही अधिकृत देशी दारू विक्रेतेचे दुकान नसल्याने होत असलेल्या अवैध देशी दारू विक्रीला पोलिस प्रशासनाने रोखावे, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Previous articleधक्कादायक ! धावत्या रेल्वेसमोर उडी! – मोबाईल बाजूला ठेवून, युवकाने जीवनयात्रा संपवली !
Next articleप्रहारचा “संताजी धनाजी” संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्कार २०२५ दिपक जाधव यांना प्रदान…..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here