आशाताई बच्छाव
– दोंडाईचात दुचाकी तिरंगा रॅलीचा उत्साह; (राष्ट्रप्रेमी,माजी सैनिक, राजकीय नेते, हजारो नागरिकांचा उस्फूर्त सहभाग). (ऑपरेशन शेंदूर च्या यशस्वीतेचा जल्लोष मोदी सरकारचे अभिनंदन)
(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
दोंडाईचाः जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा शहरात आज सकाळी दुचाकी तिरंगा रॅली काढण्यात T आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून न सुरू झालेली ही रॅली शहरातील विविध भागांतून फिरली आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ समारोप करण्यात आला. रॅलीचा मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, होळी चौक, वंजारी समाज भवन, आझाद चौक, महाराणा प्रताप पुतळा, रावळ गढी, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, शहीद ने अब्दुल हमीद चौक, राजपथ, स्टेशन भाग, आम आदमी चौक, जुगणु चौक असा होता. – रॅलीमध्ये सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे आणि माजी सैनिकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. भारत
मातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला. रॅलीमध्ये सुभेदार नामदेव वाडीले, नायक सुभेदार जगन्नाथ बोरसे, हवालदार नरेंद्र भलकार, विनोद पवार, हवालदार साहेबराव पाटील, हवालदार एम. सी. पाटील, रवींद्र पाटील, शिपाई छगन गंगाराम पाटील, हवालदार सरोज पवार, हवालदार हितेंद्रसिंग गिरासे यांच्यासह अनेक माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. याव्यतिरिक्त,
भाजपा जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, बाजार समिती सभापती नारायण पाटील, सरचिटणीस डी. एस. गिरासे, दीपक बागल, शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, नगरसेवक प्रवीण महाजन, विक्रम पाटील, विजय मराठे, हितेंद्र महाले, गिरासे, के. पी. गिरासे, संजय चंदने, मनोहर कापूरे, रावळ नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.