Home विदर्भ हिंगोली जिल्ह्यातील विना परवाना अवैध मार्गाने जनावराची तस्करी करून कत्तल कारखान्याकडे जातात

हिंगोली जिल्ह्यातील विना परवाना अवैध मार्गाने जनावराची तस्करी करून कत्तल कारखान्याकडे जातात

118
0

आशाताई बच्छाव

1001483282.jpg

हिंगोली जिल्ह्यातील विना परवाना अवैध मार्गाने जनावराची तस्करी करून कत्तल कारखान्याकडे जातात
हिंगोली.श्रीहारी अंभोरे पाटील हिंगोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू असुन सुरू असलेल्या धंद्याचे बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये नोंद करून बातमीच्या आधारे तपास करून त्या संदर्भात गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यात ऐवजी प्रकाशीत केलेल्या बातमीदाराचाच शोध घेवुन पोलीस प्रशासना कडुन बातमीदार याला दमदाटी करत असल्याचे वसमत शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराकडुन होत असल्याचे पाहायला मिळत आहे . यामुळे. मुळ चोर सोडून संन्यासाला फाशी.. देनार का प्रश्न उपस्थित होत आहे.
वसमत येथील पत्रकार DC9 मराठी न्यूज चैनल चे संपादक देविदास चपटे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे व वसमत शहरातील नागरिकांच्या सततच्या पाठपुराव्या नंतर वसमतच्या प्रत्येक जनावरांचा बाजारावर करंडी नजर ठेवून सुरू असलेल्या अवैध प्रकारे सुरू असलेल्या मंगळवार बाजारातील शैळी ‘मेंढी ‘म्हैस” गाय बैल विक्री साठी वसमत बाजारात दाखल होतात व त्यातुनच जनावरांची होणारी अवैध वाहतूक व कत्तली संदर्भात बातमी प्रकाशित केली होती.. ही बातमी प्रकाशित केल्यानंतर खरंतर पोलीस प्रशासन व प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या लोकांवर पोलीस प्रशासनाकडून खुलेआम जनावरे कत्तलखाण्यात नेणाऱ्या इसमांवर कडक कायदेशीर कार्यवाहीची होने अपेक्षीत असताना तसै नकरता चोर सोडून संन्याशाला फाशी या उक्तीप्रमाणे वसमत शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर वाघ यांनी उलट पक्षी पत्रकार देविदास चपटे यांनाच नोटीस देऊन कुठल्या पुरावांच्या आधारे ही बातमी तयार केलीत अशी विचारणा केली आहे तसेच सदरील घटने संदर्भात आम्हाला का माहिती दिली नाही याबाबत खुलासा मागविला आहे.. हा बातमीदारास दडपवण्याचा प्रकार असून बातमीप्रकाशन अधिकारांवर गदा आणण्याचा एक प्रकार आहे पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराने अशाप्रकारे करणे योग्य नाही बातमीदार यांनी प्रकाशित केलेल्या बातमी संदर्भात अनेक घटना वसमत मंगळवार बाजारातुन होतात पन सदरील चौकशी न करता बातमीदार यानाच नोटीस देण्यात आली आहे या मुळे बातमी प्रसिद्ध वेळी पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊन बातमी प्रकाशित करायची का असा प्रश्न सर्व बातमीदारतुन उपस्थित होतो.. सदरील घटनेची ठाणेदारांनी चौकशी/खुलासा करावा अशी मागणी सर्व बातमीदारतुन बोलल्या जात आहे.तसेच बातमीदार यांना नोटीस दिल्यामुळे सर्व बातमीदारातुन या प्रकाराबाबत नाराजी असल्याच पहावयास मिळत आहे, वसमत शहरातील नागरिकांनी व विविध संघटनांनी यापूर्वी या संदर्भात अनेक निवेदन दिली पण म्हणावी तशी काही ठोस कार्यवाही कधी झाल्याचे पहावयास मिळाले नाही नागरिकांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर व विविध संघटनांच्या संतप्त प्रतिक्रिया व परिस्थिती जण्य पुराव्याच्या आधारे पत्रकार देविदास चपटे यांनी सदरील बातमी केली होती या बातमीनंतर जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे जनावरांची वाहतूक करण्याचा परवाना आहे का.. महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतानाही वसमत शहरात गोवंशाची खुलेआम कत्तल होत असताना यावर प्रतिबंध आणण्या ऐवजी बातमीदार यांना नोटीस देऊन दडपवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो पोलीस प्रशासनाकडून प्रकरणाचा तपास करण्या ऐवजी दोशींवर ठोस कार्यवाही करण्या ऐवजी बातमीदार वरच दडपशाही आणण्याचा प्रयत्न केला जातोय याचा अर्थ अवैध गोहत्या करणाऱ्यांशी पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष करूनअर्थपूर्ण संबंध तर जुळलेले नाहीत ना असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.. जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणे हा महाराष्ट्र प्राणीसंरक्षण अधिनियम 1976 कलम 5(अ) प्रमाणे दखलपात्र गुन्हा असून आता या प्रकरणी काय कार्यवाही होणार वसमत शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वसमत शहरातील जनावरांच्या अवैध वाहतुकीवर व कत्तल्ली करणाऱ्या लोकांवर काय कार्यवाही करण्यात येणार याकडे हिंगोली जिल्ह्यासह सर्व महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांचे व गोरक्षकांचे लक्ष लागले आहे..

Previous articleगुगुळवाड पाणी आंदोलन प्रश्न पेटणार?
Next articleनुकसानीचे तातडीने पंचनामे करा ! पालकमंत्री रावलांचे आदेश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here