Home जालना तहानलेल्या पळसखेडा पिंपळे गावासाठी दीपक जाधव व संदीप शिरसाठ यांचे उपोषण

तहानलेल्या पळसखेडा पिंपळे गावासाठी दीपक जाधव व संदीप शिरसाठ यांचे उपोषण

60
0

आशाताई बच्छाव

1001467819.jpg

तहानलेल्या पळसखेडा पिंपळे गावासाठी दीपक जाधव व संदीप शिरसाठ यांचे उपोषण
युवा मराठा न्यूज नेटवर्क रिपोर्टर गजेंद्र लोखंडे भोकरदन
भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे गाव तीव्र पाणीटंचाईचा सामना करत असून पिण्याच्या पाण्यासाठी गावातील महिला पुरुष तरुण व लहान बालकांना वन वन भटकंती करावी लागत आहे नागरिकांची पाण्यासाठी होणारी ही भटकंती थांबवावी व पाण्याचा प्रश्न मीटवावा करिता गावातील सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव व संदीप शिरसाठ गेल्या अनेक दिवसापासून पंचायत समितीमध्ये निवेदन देऊन पाणी प्रश्न मिटवण्यासाठी चकरा मारत आहे परंतु अद्याप पर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने दिनांक2/5/2025 पासून पळसखेड पिंपळे येथील पाण्याच्या टाकीजवळ उपोषणास सुरुवात केली आहे जोपर्यंत गावाला पाणी मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार या जोडीने केला आहे त्यांना गावातील नागरिकांचा मोठ्या पाठिंबा मिळत आहे इतर गावातील सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रत्यक्ष येऊन व फोनद्वारे पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले शासनाने या उपोषणाची व गावात नागरिकांना पाण्यासाठी करावी लागणारी वन वन भटकंती थांबवावी व चालू असलेल्या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी नसता खालील मार्गाने संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही असे दीपक जाधव व संदीप शिरसाठ यांनी सांगितले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना वेळोवेळी सांगून निवेदन देऊन सुद्धा या गावावर आलेल्या या जल संकटाबाबत अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही आमचा हा प्रश्न लवकरात लवकर निकाली न निघाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दालना पर्यंत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे गावात पाणी पाणीटंचाई भासू नये म्हणून 2021 ला जल जीवनमार्फत गावात निधी मंजूर झाला होता परंतु अद्याप पर्यंत गावाला जल जीवन च पाणी मिळालाच नाही व गावात पाईपलाईनची सुद्धा व्यवस्था झालेली नाही त्यामुळे या गावावर हे जल संकट आलेले आहे कुठेतरी शासनाने या जलजीवन च्या झालेल्या भ्रष्टाचाराची सुद्धा चौकशी करण्यात यावी असे निवेदनात नमूद केले आहे या भ्रष्टाचाराची चौकशी व गावात पाणी मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असे त्यांनी सांगितले उपोषणाचा आज दुसरा दिवस असून उपोषणा स्थळी कोणताही शासकीय अधिकारी कर्मचारी ग्रामसेवक गटविकास अधिकारी यांनी भेट दिली नाही किंवा उपोषणाबाबत फोन द्वारे विचारणा केली नाही शासनाने आमच्या या उपोषणाची दखल घेऊन या गावावर होत असलेले जल संकट दूर करावी गावातीलच दलित वस्तीला पाण्यासाठी खूप भटकंती करावी लागत आहे या ठिकाणी जल जीवन मिशन अंतर्गत पाईप लाईन टाकायला पाहिजे होती परंतु टाकले नाही व जलजीवांच्या निधीच्या नावालाच प्रसिद्धी मिळाली असून गावात कोणत्याही प्रकारची पाईपलाईन करण्यात आली नाही जल जीवन मिशन अंतर्गत गावापर्यंतच टाईप सोडले परंतु गावाला अध्ययन पर्यंत पाणी सोडू शकले नाही कुठेतरी या जलजीवर अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची सुद्धा चौकशी करावी अशी या उपोषणाची कर्त्याची मागणी आहे यावेळी गावातील बऱ्याचशा महिला उपोषण स्थळी उपस्थित होत्या व त्यांच्या कडून संतप्त प्रतिक्रिया ऐकावयास मिळाल्या आमचे गाव मतदानापुरतेच आहे शासनाने व लोकप्रतिनिधींनी याची दखल घ्यावी नसता गावातील महिला मुलं ज्येष्ठ नागरिक व इतर तरुणांच्या वतीने तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी हंडा मोर्चा काढल्या जाईल असे त्यांनी सांगितले याही मार्गाने न्याय न मिळाल्यास परत हा मोर्चा जिल्हा परिषद जालना व जिल्हाधिकारी कार्यालय जालना मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालय संभाजीनगर या ठिकाणी हा घागर मोर्चा नेण्यात येईल असे दीपक जाधव संदीप शिरसाठ यांनी सांगितले युवा मराठा नागरिकांच्या वतीने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here