Home धाराशिव मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये-शेतकरी नेते विनायकराव पाटील

मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये-शेतकरी नेते विनायकराव पाटील

350

आशाताई बच्छाव

1001438519.jpg

मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये-शेतकरी नेते विनायकराव पाटील उमरगा: मराठा समाजाला कुणबी आरक्षणाबाबत सरकार दखल घेत नाही ,दिवसेंदिवस आरक्षण देण्यासाठी सरकार चालढकल करत आहे. त्यामुळे तरुणांमध्ये वैफल्य,निराशा आली आहे.उमरगा तालुक्यातील दाबका येथील मराठा आरक्षणासाठी कै.प्रशांत गोविंदराव पवार यांनी आत्महत्या केली असता ,जिल्हाभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी मराठा योद्धा ज्येष्ठ शेतकरी नेते समाजसेवक विनायकराव पाटील साहेब यांनी भेट घेऊन कुटुंबाची विचारपूस केली .मराठा समाजातील तरुणांच्या हाताला काम नसल्याने आणि अनेक तरुण उच्च शिक्षीत असून सुद्धा अनेक संधीचा फायदा आरक्षण नसल्याने होत नाही. तरी निराश आणि हताश न होता तरुणांनी आपल्या कुटुंबाचे हित लक्षात ठेवून संयम राखला पाहिजे . आपल्या कुटुंबाचा ही विचार केला पाहिजे.आपण आरक्षण मिळवण्यासाठी सर्वांनी संघटितपणे लढा लढू आणि आरक्षण मिळवू .आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही .त्यामुळे भविष्याचा विचार करून यापुढे अशा घटना घडू नये, यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत. लवकरात लवकर हा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा .अशी विनंती सरकारला यावेळी केली .आणि या कुटुंबाच्या सोबत कायम आहे अशी भावना व्यक्त केली. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने, प्रा.एस.के. पटेल,दाबका गावचे सरपंच गोविंद सूर्यवंशी, विष्णू गायकवाड आदी उपस्थित होते.

Previous articleपहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्याच्या निषेधार्थ वाशीम मध्ये आंदोलन
Next articleजालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर 85 किलो 640 ग्रॅम गांजा सह 03 आरोपी जेरबंद स्थागुशा व दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.