
आशाताई बच्छाव
कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक; प्रहार संघटनेचे ११ एप्रिल ला राज्यभर आंदोलन, आमदाराच्या घरासमोर टेंभी पेटवणार. दैनिक युवा मराठा. पी.एन.देशमुख. अमरावती जिल्हा ब्युरो प्रतिनिधी. अमरावती. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राहा संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत .शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटने कडून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. आहे ११ एप्रिल रोजी आमदारांच्या घरासमोर टेंभी पेटून आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. बारामती मधील शिवनगर येथील दी माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड येथे एक कार्यक्रमाच्या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना ३१ मार्च पर्यंत कर्ज भरण्याचे आवाहन केले होते इतकेच नाहीतर पाच वर्ष काय? पुढच्या वर्षी देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे त्यांनी थेटर सांगितले यामुळे महायुती सरकारने जाहीरनाम्यात दिलेले शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण होणार नसण्याचे स्पष्ट झाले .आहे यावरून विरोधकाकडून सरकारवर टीका केली जात आहे अशातच आता बच्चू कडू हे देखील आक्रमक झाले असून ,त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आज गुढीपाडव्या दिवशी सरकारला दिला आहे.आज गुढीपाडव्याच्या निमित्त बच्चू कडू यांनी प्रहारच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे संघटन बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी ही बैठक असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले .तसेच सरकारने निवडणुकीच्या वेळेस शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावाचे आश्वासन दिले होते त्या संदर्भात एक मोठे आंदोलन उभे करणार आहोत. या आंदोलनासाठी सुरुवात ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीच्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व आमदारांच्या घरासमोर रात्री १२ वाजता गळ्यात निळा दुपट्टा आणि हातात भगवा झेंडा घेऊन टेंबे मशाल घेण्यात पेटवण्याचे आंदोलन करणार आहोत निवडणुकीच्या वेळी सरकारने जे आश्वासन दिले होते त्याची दखल घ्यावी किंवा टेंबेच्या मशालीने आम्हाला पेटून द्या असे निर्देश सरकारला देणार आहोत .दिलेल्या शब्दाची आठवण देण्यासाठी ११ एप्रिल रोजी रात्री १२ वाचता ये आंदोलन करणार आहेत. दरम्यान दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देखील आज गुढीपाडव्याच्या दिवशी अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफी बद्दल केलेल्या विधानाचा कोल्हापूर येथे निषेध केला त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारून सरकारचा निषेध करण्यात आला. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूक आधी १०००दिवसाच्या आज शेतकऱ्यांचा समावेश सातबारा कोरा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. शिवाय भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये सदस्य शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्त्याचा देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन करून स्वतःचे व सरकारचे अपयश दाखवून दिले अशी टीका स्वाभिमानीच्या वतीने करण्यात आली.