Home बीड परळीत नगर परिषदेकडून होणाऱ्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार जोमात तर प्रशासन कोमात!

परळीत नगर परिषदेकडून होणाऱ्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार जोमात तर प्रशासन कोमात!

81
0

आशाताई बच्छाव

1001354771.jpg

परळीत नगर परिषदेकडून होणाऱ्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार जोमात तर प्रशासन कोमात!

मोहन चव्हाण
उपजिल्हा प्रतिनिधी बीड

बीड/परळी दि. २५ मार्च २०२५ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ नगर परिषदेकडून शहरातील मिलींद नगर परिसरात होत असलेल्या रस्ते बांधणी कामात भ्रष्टाचार होत असून होत असलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे मत मिलींद नगर येथील नागरीकांकडुन येत आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ नगर परिषद नेहमीच वादाच्या भोवऱ्यात आणि भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेली असते. परळी वैजनाथ नगर परिषदेकडून शहरातील विविध प्रकारच्या योजना असतील किंवा सार्वजनिक कामे असतील ही निकृष्ट दर्जाची करत असल्याचे अनेक प्रकार या अगोदर उघडकीस आले आहेत. परंतू राजकीय वरदहस्त लाभलेल्या परळी वैजनाथ नगर परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी हे शहरातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्याऐवजी सर्वसामान्य जनतेला जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचे मत जनतेतून येताना दिसून येते. तसेच शहरातील मिलींद नगर येथील बौद्ध विहार ते रेल्वे रूळाच्या हद्दिपर्यंत असलेल्या रस्त्याचे बांधकाम करत असताना केलेले सिमेंट कॉंक्रीटीकरण हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्ता लेवल मध्ये न करता रस्त्याची जाडी कमी जास्त करण्यात आली असून सिमेंट अतिशय कमी प्रमाणात वापरल्याने रस्त्याला भेगा पडल्या असल्याचे मत मिलिंद नगर येथील नागरीकांकडुन येत आहे. दरम्यान परळी वैजनाथ नगर परिषदेचे बांधकाम अभियंता ढवळे यांनी काम पूर्ण होण्या आधीच संबंधित गुत्तेदार आणि मिलिंद नगर येथील नागरिकांना काम उत्कृष्ट दर्जाचे झाले असल्याचे सांगितले असल्याचे मत नागरीकांकडुन येत आहे. या प्रकारामुळे हा रस्ता किती दिवस टिकेल असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी याच मिलिंद नगर परिसरातील नागरिक पाणी प्रश्न घेऊन नगर परिषदेत गेले असता येथील कर्मचारी आणि अधिकारी यांनी तब्बल आठ दिवसांनंतर पाणी पुरवठा चालू केला. नगर परिषदेच्या अशा या गलथान कारभाराळामुळे नागरिकांमध्ये नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे, तरी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Previous articleआलापुर शिवारात शॉर्टसर्किटमुळे अग्नी तांडव शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Next articleटिटाणे फाट्यावर आबासाहेब स्व.राजू पाटील फाउंडेशनच्या वतीने पाणपोईचे लोकार्पण…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here