Home नांदेड वझरगा येथील शेतकऱ्यांच्या पुलाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू- जिल्हाधिकारी

वझरगा येथील शेतकऱ्यांच्या पुलाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू- जिल्हाधिकारी

76

आशाताई बच्छाव

1001230773.jpg

वझरगा येथील शेतकऱ्यांच्या पुलाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू- जिल्हाधिकारी

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

देगलूर –मन्याड नदीच्या कडेवर वसलेले वझरगा, तुपशेळगाव, आणि गळेगाव या तिन गावचे शिवार आहे. यामध्ये शेकडो एकर जमीन प्रभावीत होत असते. मात्र लगतच्या वसलेल्या तिन्ही गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी मन्याड नदीला ओलांडून जावे लागते. ज्यामध्ये शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. अशावेळी पान्याचा प्रवाह अचानकपणे वाढल्यास शेतकऱ्यांचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही. या गंभीर मुद्द्याला अनुसरूनच गेल्या अनेक वर्षापासून वझरगा येथील शेतकरी प्रशासन तथा लोकप्रतिनिधीना सतत पाठपुरावा चालू ठेवला होता . याच अनुषंगाने संबंधित विषयाची गांभीर्याने दखल घेत नवनियुक्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे आपला पहिला दौरा थेट वझरगा येथील मन्याड नदीवर भेट देऊन सुरुवात केला आहे. ग्रामीण भागातील पहिला दौरा थेट शेतकऱ्यांसाठी झाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. शिवाय जीवघेणं अवस्थेतून आपली सुटका होणाऱ या आशेने शेतकऱ्यांनीही श्वास मोकळा केला.

Previous articleशांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे 11 व्या वर्धापन दिनानिमित्त 27 व 28 फरवरी ला धम्म मेळावा
Next articleइस्कॉनवर बंदी घाला नाहीतर आम्ही भाविकांना मारून टाकू’; इस्लामी गटाचा मोहम्मद युनूस सरकारला अल्टिमेटम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.