आशाताई बच्छाव
शेतकऱ्यांच्या फळबाग पिक विम्यांची रक्कम तात्काळ अदा करुन, ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या ठेवीदाराच्या ठेवी परत करा आ. नारायणराव कुचे यांची विधानसभेत मागणी
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) जालना जिल्ह्यातील फळबाग पिक विमाची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ अदा करुन ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या ठेवीदाराला ठेवी तात्काळ ठेवीदारांना तात्काळ देण्याची मागणी बदनापूर-अंबड विधानसभा मतदार संघाचे आ.नारायणराव कुचे यांनी नागपुर येथील हिवाळी अधिवेशनाच्या औचीत्याचा मुद्यावरुन विधानसभा अध्यक्षाकडे केली.
यावेळी नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात आ. कुचे म्हणाले की, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याचे फळबागाचे, व झाडाचे व पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे परंतु पिक विमा कंपनीने काही निवडक शेतकऱ्यांनाच पिकविमा दिला असून उर्वरीत काही शेतकऱ्यांना अद्याप पिकविमा कंपनीने दिलेला नाही तरी राज्यशासनाने याबाबत पिक विमा कंपनीला सुचना देवून पिकविमा शेतकयांना तात्काळ देण्याची मागणी केली तसेच जालना जिल्ह्यातील बदनापूर व अंबड ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या साडेतिन लाख ठेवीदारांच्या ठेवी असुन यामध्ये शेतकरा, कामगार व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या ठेवी असुन त्या ठेवी संबधीत ठेवीदारास तात्काळ अदा करण्यात येवुन बँकेच्या दोषी संचालक वर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी आ.नारायण कुचे यांची विधानसभेत राज्यशासनाकडे केली आहे.