Home जालना शेतकऱ्यांच्या फळबाग पिक विम्यांची रक्कम तात्काळ अदा करुन, ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या ठेवीदाराच्या...

शेतकऱ्यांच्या फळबाग पिक विम्यांची रक्कम तात्काळ अदा करुन, ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या ठेवीदाराच्या ठेवी परत करा आ. नारायणराव कुचे यांची विधानसभेत मागणी

34
0

आशाताई बच्छाव

1001071183.jpg

शेतकऱ्यांच्या फळबाग पिक विम्यांची रक्कम तात्काळ अदा करुन, ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या ठेवीदाराच्या ठेवी परत करा आ. नारायणराव कुचे यांची विधानसभेत मागणी
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) जालना जिल्ह्यातील फळबाग पिक विमाची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ अदा करुन ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या ठेवीदाराला ठेवी तात्काळ ठेवीदारांना तात्काळ देण्याची मागणी बदनापूर-अंबड विधानसभा मतदार संघाचे आ.नारायणराव कुचे यांनी नागपुर येथील हिवाळी अधिवेशनाच्या औचीत्याचा मुद्यावरुन विधानसभा अध्यक्षाकडे केली.
यावेळी नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात आ. कुचे म्हणाले की, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याचे फळबागाचे, व झाडाचे व पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे परंतु पिक विमा कंपनीने काही निवडक शेतकऱ्यांनाच पिकविमा दिला असून उर्वरीत काही शेतकऱ्यांना अद्याप पिकविमा कंपनीने दिलेला नाही तरी राज्यशासनाने याबाबत पिक विमा कंपनीला सुचना देवून पिक‌विमा शेतकयांना तात्काळ देण्याची मागणी केली तसेच जालना जिल्ह्यातील बदनापूर व अंबड ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या साडेतिन लाख ठेवीदारांच्या ठेवी असुन यामध्ये शेतकरा, कामगार व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या ठेवी असुन त्या ठेवी संबधीत ठेवीदारास तात्काळ अदा करण्यात येवुन बँकेच्या दोषी संचालक वर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी आ.नारायण कुचे यांची विधानसभेत राज्यशासनाकडे केली आहे.

 

Previous articleसोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करा – गोरंटयाल
Next articleआमदार अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीत जालना महापालिकेत आढावा बैठक संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here