आशाताई बच्छाव
जैविक शेती मार्गदर्शन व चर्चासत्र कार्यक्रमात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेले लासलगाव च्या जवळील पचोरे या गावामध्ये आयपीएल बायोलॉजिकल्स ली दिल्ली टीम नाशिक याच्या संयुक्त विद्यमाने जैविक शेती मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम हा दि.27 सप्टेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी पार पडला. त्यामध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने शेतीसाठी बहुउपयोगी जिवाणू खते जैविक कीटकनाशके, जैविक बुरशीनाशके
याची ओळख आणि आपल्या शेतीत वापर कसा करावा? केव्हा करावा? याचे फायदे कशाप्रकारे होतात? शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांची वाढ कशी करावी? त्याचबरोबर रायझोबियम, अझोटोबॅक्टर, मायकोरायझा, ट्रायकोडर्मा, विव्हेरिया, मेटारायझियम, नत्र, स्फुरद व पालाश विघटन करणारे जिवाणू यांचा शेतीसाठी होणारा फायदा. यावर सखोल मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन अनिल चिटणीस बोलताना म्हणाले की, जिवाणूंची शेती ही फायदेशीर शेती आहे अनेक वर्षांपासून आपण रासायनिक खते जमिनीमध्ये टाकून आपली जमीन न परवडणारी आणि निर्जीव करून ठेवली आहे त्यामुळे आता आपल्याला जिवाणूंचा वापर करून शेती जिवाणूंनी नीमंत करावी लागणार आहे.
तसेच
उत्तम नागरे कृषी विक्रेते शेतकऱ्याला जर समाधानाने शेती करायची असेल तर उत्पादन खर्च कमी करून
त्यामध्ये जिवाणूंचा वापर करून शेती केली तर नक्कीच शेतकऱ्यांना समाधानाचे आणि आनंदाचे दिवस दिसतील.
संदीप सोनवणे आपण गेल्या काही दिवसांपासून पंजाब आणि हरियाणा येथील शेत जमिनीचे प्रश्न एकत किंवा वाचले असेल. त्याप्रकारे आपली शेतजमिनीची परिस्थिती होऊ नये यासाठी आपल्याला हुशार व्हावं लागेल. कार्यक्रमाच्या शेवटी चर्चासत्र पार पडले त्यामध्ये सेंद्रीय शेती का करावी? सेंद्रिय शेतीचे फायदे याबाबत चर्चा झाली त्यानंतर गावातील शेतकऱ्यांनी सुद्धा सेंद्रीय शेती करण्याचा निश्चय त्यावेळी घेतला.
प्रसंगी पाचोरा गावचे सरपंच तसेच प्रगतशील शेतकरी भारत जगताप, कंपनी प्रतिनिधी श्री नीतीन गोसावी(एम नाशिक), श्री राहुल बोरगुडे(फील्ड मार्केटिंग मॅनेजर नाशिक) ,श्री किरण शिंदे(टी एम निफाड ), ऋषिकेश आंधळे आदी उपस्थित होते. त्यानंतर कार्यक्रमांमध्ये उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला.