Home उतर महाराष्ट्र सत्संगातून देश, धर्माला बळकटी भास्करगिरी महाराज; सोनईत रामायण कथेचे ध्वजारोहण

सत्संगातून देश, धर्माला बळकटी भास्करगिरी महाराज; सोनईत रामायण कथेचे ध्वजारोहण

10
0

आशाताई बच्छाव

1000765866.jpg

सत्संगातून देश, धर्माला बळकटी

भास्करगिरी महाराज; सोनईत रामायण कथेचे ध्वजारोहण
सोनई, कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी – रामायण कथा म्हणजे फक्त धार्मिक कार्य नसून कथा श्रवणातून नात्याचे बंधन अधिक दृढ होतात तसेच मनातील अनेक संभ्रम दूर होवून सद्‌मार्गाचे दर्शन घडते. धर्म नियमांचे पालन केले तर निश्चितच धर्म आणि देशाला बळकटी प्राप्त होते, असे विचार देवगड संस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केले. सोनई येथे आमदार शंकरराव गडाख पांच्या संकल्पनेतून तसेच जगदंबादेवी ट्रस्ट, ज्ञानेश्वर सांस्कृतिक प्रतिष्ठान व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानमार्फत रामायणचार्य रामराव महाराज ढोक पांच्या सुवाश्र वाणीतून आयोजित तुलसी रामायण कथा सोहळ्याचे उदघाटन धर्म ध्वजारोहण व दीपप्रज्वलन
सोनई येथे तुलसी रामायण कथा सोहळ्याचे उद्घाटन धर्म ध्वजारोहणाने करताना देवगड संस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज.
करन झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात भास्करगिरी महाराज बोलत होते. संत ज्ञानेश्वर संस्थानचे संतसेवक देविदास महाराज म्हस्के, कारभारी महाराज
झरेकर, पंढरीनाथ महाराज तांदळे, कारभारी महाराज पंडित, विठ्ठल महाराज खाडे, साध्वी तुलसीदेवी, बाळकृष्ण महाराज सुडके व संत, महंत उपस्थित
होते. संत ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्ता विश्वासराव गडाख, माजी सभापती सुनील गडाख यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
म्हस्के महाराज यांनी नेवारेसे तालुक्यातील सर्व वारकरी साधकांना भास्करगिरी महाराज आईची माया देत असल्याचे सांगून धर्मध्वजावदत् माहिती दिली. प्रास्ताविक भाषणात मुळा एज्युकेशनचे उपाध्यक्ष उदयन गडास यांनी रामायण सोहळा आयोजनाची माहिती दिली. ध्वजारोहणाचे पौरोहित्य अशोक कुलकर्णी व डिगंबर जोशी यांनी केले. प्राचार्य डॉ. गोरक्षनाथा कल्हापुरे यांनी सूत्रसंचालन केले. मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवरू यांनी आभार मानले.

Previous articleपोषण आहार माह कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतीसाद पोषण आहार बाळासाठी अमृत आहे त्याचे सेवन व्यवस्थीत करा
Next articleबाप्पांचा विसर्जन सोहळा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here