Home नाशिक तीन वर्षीय बालकाचा रात्री वाढदिवस, पहाटे सर्पदंशाने मृत्यू

तीन वर्षीय बालकाचा रात्री वाढदिवस, पहाटे सर्पदंशाने मृत्यू

372
0

आशाताई बच्छाव

1000495324.jpg

तीन वर्षीय बालकाचा रात्री वाढदिवस, पहाटे सर्पदंशाने मृत्यू

सतीश सावंत (कसमादे विभागीय प्रतिनिधी)

वटार (बागलाण) : येथील तीन वर्षीय बालकाचा सोमवारी (दि. 24) रोजी पहाटे झोपेतच सर्पदंशाने मृत्यू झाला.
माजी सरपंच ज्ञानदेव खैरनार यांचा नातू स्वराज सागर खैरनार हा डोंगरेज शिवारातील शेतातील घरात झोपला होता. पहाटेच्या सुमारास तो जोरात रडल्याने पालकांना जाग आली. त्यावेळी त्याला सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच विरगाव आरोग्य केंद्रात आणले. परंतु या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यास सटाणा येथे नेत असताना तो बेशुद्ध झाला. रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

वेळेवर उपचार झाले असते तर वाचला असता जीव
येथून जवळच असलेल्या विरगाव आरोग्य केंद्रात वेळेवर उपचार न झाल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तेथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते त्यामुळे औषधोपचार कसे करणार? असा प्रश्न होता त्यामुळे त्याला सटाणा येथे हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत बराच वेळ निघून गेल्याने बालकाचा मृत्यू झाला. वेळेवर योग्य औषधोपचार आणि सुविधा मिळाली असती तर एकुलता एक स्वराजचे प्राण वाचले असते अशी भावना व्यक्त होत आहे.

नियतीच्या मनात वेगळेच

स्वराजचा रविवारी (दि.23) रात्री मोठ्या थाटामाटात तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी उपस्थित राहून त्यास शुभाशीर्वाद दिले. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच असावे. वाढदिवस साजरा झाल्यानंतर काही तासातच पहाटे चार वाजेच्या पूर्वी त्यास सर्पदंश झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

पहाडी नागाचा दंश

स्वराजला दंश करणारा सर्प त्याच खोलीत दडून बसला होता. त्यामुळे सर्पमित्र देवा वाघ यास बोलविण्यात आले. त्यांनी स्वराज झोपलेल्या पलंगाखालीच दडून बसलेल्या सर्पाला पकडले. तो अतिविषारी पहाडी नाग असल्याचे लक्षात येतातच त्यास शिताफिने पकडून जंगल परिसरात सोडण्यात आले.

Previous articleआडगाव राजा व वडाळी गावात हिवताप व डेंगू आजाराबाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न
Next articleवेदांत शिंदेची इस्रो दौऱ्यासाठी निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here