Home उतर महाराष्ट्र ज्ञान आचरणात आणण्याची गरज’

ज्ञान आचरणात आणण्याची गरज’

64
0

आशाताई बच्छाव

1000493671.jpg

‘ज्ञान आचरणात आणण्याची गरज’

सोनई, कारभारी गव्हाणे-. माऊलींनी सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या मनात ‘विश्वची माझे घर’ ही भावना रुजली त्यांच्या हातून चांगले सत्कर्म होत आहेत. ग्रंथ वाचणे पुण्य असले, तरी त्यातील ओव्या लक्षात ठेवणे व अर्थ समजून घेण्यावर न थांबता प्राप्त ज्ञानाची अनुभूती आचरणात येणे आवश्यक आहे, असे विचार संत ज्ञानेश्वर पैसखांब संस्थानचे संतसेवक महंत देविदास महाराज म्हस्के यांनी व्यक्त केले.
सोनई येथील पसायदान-आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वतीने दहा गरजू मुलींचे पाचवी ते दहावीपर्यंत शैक्षणिक पालकत्व कार्यक्रमात ते बोलत होते. संत ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त कैलास जाधव, संत निरंकारी परीवाराचे विठ्ठल महाराज खाडे, गणेश महाराज नवले, शिवाजी बाफणा, भैय्या कावरे, डॉ. संदीप तांबे, विठ्ठल सावंत उपस्थित होते. उपक्रमास योगदान दिलेले साई आदर्श मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजीराव
कपाळे, रेणुका येडुलकर-वाघ, विजय लोहकरे, शहाराम तांदळे, पुनम लकडे, अमर जायभाय, राहुल दरंदले, सुधीर वैरागर आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले यांनी के चंद्रकांत राऊत यांचा विशेष सत् करण्यात आला. डॉ. तुषार दराडे य सुत्रसंचालन केले. अरुण घावटे आभार मानले.

Previous articleआमदार मंगेश चव्हाण यांना जीवे ठार मारण्याची धमकी म्हणजे महाविकास आघाडीच्या सुनियोजित कटाचा भाग,
Next articleहनुमान वार्डात मागेल तिथे काम देऊन निधी उपलब्ध करून दिला.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here