![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2024/04/IMG-20240428-WA0052.jpg)
![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20240114-WA0024.jpg)
आशाताई बच्छाव
कोंडये गाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सागर सुरेश देसाई सलग दुसऱ्यांदा बिनविरोध रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
संगमेश्वर तालुक्यातील कोंडये गावच्या पंधरा ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदी ग्रामपंचायतचे माजी सदस्य सामाजिक कार्यात अग्रेसर होऊन धडपडणारे तसेच उच्च शिक्षित असलेले सागर सुरेश देसाई यांची तंटामुक्त अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सरपंच महेश प्रभाकर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ग्रामसभेत सामाजिक कार्यात गावातच नव्हे, तर संपूर्ण खाडीभागात अग्रस्थानी राहणारे तसेच या पूर्वी त्यांच्याकडे गावाने सोपवलेली तंटामुक्त समिती अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी समिती सदस्य व ग्रामस्थांना बरोबर व विश्वासात घेत गावातील छोटे-मोठे तंटे पोलीस ठाण्या पर्यंत न जाऊ देता गाव पातळीवर मिटवण्याचा प्रयत्नच नव्हे तर यशस्वीही केला. तसेच गावात तंटे होऊ नये या करीता जनजगृतीही तेवढयाच जोमाने केला.
या कार्याची दखल घेत ग्रामस्थांच्या उपस्थित झालेल्या ग्रामसभेत पुन्हा तंटामुक्त समिती अध्यक्षपदाची जबाबदारी सागर देसाई यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या सभेत गावच्या पहिल्या महिला सरपंच होण्याचा ज्यांनी मान मिळवला होता त्या माजी सरपंच सौ.पूनम महेश देसाई, ग्रामसेवक विजापुरे, पोलीस पाटील विजय शिंदे, माजी सरपंच सुरेश दसम, सुनील देसाई, रामचंद्र पडये, माजी उपसरपंच दीपक शिंदे, दीपक उर्फ बंड्या शिंदे आदी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
आपल्या कार्यची दखल घेत गावाने माझ्यावर पुन्हा जी जबाबदारी सोपवली आहे, ती यापुढेही समिती सदस्य आणि ग्रामस्थांना बरोबर व विश्वासात घेवूनच योग्य प्रकारे पार पडणार असल्याचे प्रतिपादन सागर देसाई यांनी केले. सागर देसाई यांच्या कार्याचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.