![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2024/04/IMG-20240428-WA0052.jpg)
![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20240114-WA0024.jpg)
आशाताई बच्छाव
महामार्गासाठी कोकणातील खासदार, आमदार यांचे सा. बां. मंत्री रविंद्र चव्हाण साकडे रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले व निकृष्ट दर्जाचे झालेल्या कामाबाबत कोण आतील विषेशता रायगड व रत्नागिरी जिल्हय़ातील खासदार आमदार यांनी एकत्र येत नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची मंत्रालयात भेट घेवून या महामार्गाच्या खरडलेल्या कामाचा आढावा घेतला.
या बैठकीला खा. विनायक राऊत. खा. सुनिल तटकरे. आम. प्रविण दरेकर. आ. शेखर निकम. आ. राजन साळवी. आ. योगेश कदम. आम. वैभव नाईक. आ. रवी पाटील. आ. भरत गोगावले. आम. आदिती तटकरे. आम अनिकेत तटकरे. आ. बाळाराम पाटील. याचेसह राजन तेली. दिपक पटर्वधन आदी उपस्थित होते.
या बैठकीत या महामार्गाचे झालेले काम हे काही ठिकाणी निकृष्ट झालेले असल्याने खड्यांचे साम्राज्य झालेले असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. चालकांना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच ठेकेदार कंपनी निधी नसल्याचे कारण देत काम रखडवत आहे. काम करताना ठेकेदार कंपनी पुरेशी काळजी न घेता काम करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. या महामार्गाचे काम चांगल्या प्रकारे लवकरात लवकर पुर्णत्वास जावे. डोंगर खचल्याने अनेक ठिकाणी रस्ता बंद करावा लागत असल्याने त्यावरही त्वरीत कार्यवाही करावी. यासाठी मंत्री महोदयांनी जातीने लक्ष घालावे अशी मागणी या सर्वांनी केली. तसेच गणपतीसण तोंडावर असल्याने या रस्त्यांची त्वरीत डागडुजी करून गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सर्वाेतोपरी उपाययोजना करण्यात यावी. अशी मागणी करणेत आली.
या महामार्गाच्या कामाबाबतचा अवहाल तयार करून केंद्रीय मंत्री ना. नितिन गडकरी यांचे समवेत खासदारासह बैठक घेवून हे काम येत्यावर्षभरात पुर्णत्वास जाईल याकडे जातीने लक्ष घालीन. असे ना. चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच गणपतीपुर्वी खड्डेमय रस्ता दुरूस्ती करण्याच्या सुचना संबधीतांना देवून रोजच्या कामाचा अवहाल सादर करण्यात यावा सा आदेश हि ना. चव्हाण यांनी दिला आहे.