Home अकोला कंचनपुर येथील भागवत कथा सप्ताहाची सांगता गाव … कंचनपुर

कंचनपुर येथील भागवत कथा सप्ताहाची सांगता गाव … कंचनपुर

162
0

राजेंद्र पाटील राऊत

कंचनपुर येथील भागवत कथा सप्ताहाची सांगता
गाव … कंचनपुर                                                               अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

कंचनपुर येथे सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाची शनिवार दिनांक 19 मार्च रोजी सांगता झाली. या सप्ताहाचे आयोजन गुरुवर्य हभप तुकाराम महाराज सखारामपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते…..हभप लक्ष्मण महाराज,सावरपाटी यांचे काल्याचे कीर्तन आणि कंचनपुर येथील ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद होऊन सांगता झाली. संध्याकाळी टाळ मृदंगाच्या निनादात “ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या गजरात भाविकांनी गाव प्रदक्षिणा केली. कंचनपुर येथील सांप्रदायिक मंडळाच्या वतीने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.सप्ताहात सात दिवस भागवताचार्य, हभप राजेंद्र महाराज वक्ते,पाळोदी यांनी भागवत कथा कथन करून भाविकांना भगवत भक्तीत तृप्त केले. तसेच दैनंदिन कीर्तन, भजन, हरिपाठ, काकड आरती, हरिजागर आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते….सप्ताहामध्ये हभप बळीराम महाराज चोरे,कंचनपुर , हभप केशव मोरे महाराज,म्हैसपूर , हभप बाजीराव महाराज,इलोरा , हभप माणिकराव महाराज,कोकलवाडी,हभप गोपाळ महाराज उरळकर, हभप अरुण महाराज लांडे पारस,हभप सारंगधर महाराज मेहुनकर,हभप लक्ष्मण महाराज सावरपाटी यांची कीर्तन सेवा झाली. यावेळी पंचक्रोशीतील टाळकरी मंडळी तसेच श्री.संत गजानन महाराज महिला भजनी मंडळ कंचनपुर,बाल भजनी मंडळ कंचनपूर यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने सप्ताहात सहभागी झाले होते.

Previous articleमुखेड पंचायत समितीवर प्रशासक नियुक्ती  गटविकास अधिकारी भालके यांनी स्विकारला पदभार
Next articleपाटबंधारे उप विभागाची पाणी पट्टी वसुली सुरू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here